Categories: ठाणे

दिवाळीसाठी ठाणे विभागातून धावणार अतिरिक्त बसेस

Share

ठाणे (प्रतिनिधी) : एसटीच्या ठाणे विभागाने यंदा प्रवाशांसाठी खास दिवाळी भेट दिली आहे. महामंडळाच्या ठाणे विभागातर्फे दिवाळीकरिता जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. येत्या १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत ठाणे एसटीच्या विविध आगारांमधून प्रतिदिन ३०जास्त बसेस धावणार आहेत. या गाड्यांसाठीची आरक्षण प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती ठाणे एसटी विभागाकडून देण्यात आली आहे.

गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या नागरिकांची तर नवरात्रीदरम्यान कोल्हापूर, सोलापूर तसेच नाशिक या ठिकाणी देवदर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. या नागरिकांच्या सोयीसाठी राज्य एसटी विभागाकडून दरवर्षी अधिकच्या बसेस सोडण्यात येतात. यावर्षीदेखील गणेशोत्सवादरम्यान ठाणे एसटी विभागाकडून कोकणात जाण्यासाठी अधिकच्या गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या अधिकच्या वाहतुकीतून ठाणे एसटी विभागाला दोन कोटी रुपयांहून अधिकचे उत्पन्न मिळाले होते.

नवरात्रीनंतर येणाऱ्या दिवाळी उत्सवात मुंबई, ठाणे आणि उपनगरांतून अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, पुणे, उस्मानाबाद, कोल्हापूर, पाचोरा, कराड, शिरूर, जळगाव या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. या पार्श्वभूमीवर ठाणे एसटी विभागातर्फे सर्व भागांमध्ये जाण्यासाठी अधिकच्या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील विविध बस आगारांतून या भागांमध्ये दररोज अधिकची वाहतूक करण्यात येणार आहे. १५ ते ३० ऑक्टोबरदरम्यान ही वाहतूक होणार आहे.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

1 hour ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

3 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago