काँग्रेस, कम्युनिस्ट नष्ट होतेय; अमित शहांचा काँग्रेससह डाव्या पक्षांवर हल्लाबोल

  95

थिरुवअनंतपुरम : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी कधीही गरिबांसाठी काम केले नाही. तसेच काँग्रेस भारतातून संपत आहे, अशा शब्दांत शहा यांनी म्हटले आहे.


केरळमधील थिरुवअनंतपुरम इथे भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती परिषदेत शहा बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपने एससी-एसटी समाजासाठी केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीवर टीका करताना त्यांनी केवळ या समाजांचा व्होट बँक म्हणूनच वापर केल्याचा आरोप केला.


शहा म्हणाले, देशातून काँग्रेस संपत चालली आहे, तर जग कम्युनिस्ट पार्टीपासून मुक्त होत आहे. जर केरळला भविष्य असेल, तर ते केवळ भाजपसोबतच आहे. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीने कधीही अनुसूचित जमाती आणि गरिबांसाठी काम केले नाही, त्यांनी यांना केवळ व्होट बँक असेच समजले. गेल्या काही दिवसांपासून देशातील प्रत्येक भागांमध्ये अमित शहा यांचे दौरे वाढीस लागले आहे. गृहमंत्री म्हणून सुव्यवस्थेचा आढावा घेताना राज्याराज्यांतील अभ्यास अमित शहा करत आहेत.

Comments
Add Comment

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई: भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

अ‍ॅपलच्या योजनेला ब्रेक; ३०० चिनी अभियंते भारतातून माघारी

मुंबई : भारताची जागतिक उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या अ‍ॅपलच्या 'आयफोन १७' प्रकल्पाला

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी

दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ तिबेटी परंपरेलाच: किरेन रिजिजू

तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना भारताचे

ब्रिटिश रॉयल नेव्हीचे बंद पडलेले F35 B लढाऊ विमान, भारतातून तुकडे करुन परत पाठवणार

केरळमध्ये अडकलेल्या लढाऊ विमानाची अखेर दुरुस्ती झालीच नाही, शेवटी तुकड्यांमध्ये ब्रिटनला

बेदरकार गाडी चालवणाऱ्यांना विमा भरपाई नाही - सर्वोच्च न्यायालय

स्वतःच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना भरपाई मिळणार नाही नवी दिल्ली : भारताच्या