काँग्रेस, कम्युनिस्ट नष्ट होतेय; अमित शहांचा काँग्रेससह डाव्या पक्षांवर हल्लाबोल

थिरुवअनंतपुरम : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी कधीही गरिबांसाठी काम केले नाही. तसेच काँग्रेस भारतातून संपत आहे, अशा शब्दांत शहा यांनी म्हटले आहे.


केरळमधील थिरुवअनंतपुरम इथे भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती परिषदेत शहा बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपने एससी-एसटी समाजासाठी केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीवर टीका करताना त्यांनी केवळ या समाजांचा व्होट बँक म्हणूनच वापर केल्याचा आरोप केला.


शहा म्हणाले, देशातून काँग्रेस संपत चालली आहे, तर जग कम्युनिस्ट पार्टीपासून मुक्त होत आहे. जर केरळला भविष्य असेल, तर ते केवळ भाजपसोबतच आहे. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीने कधीही अनुसूचित जमाती आणि गरिबांसाठी काम केले नाही, त्यांनी यांना केवळ व्होट बँक असेच समजले. गेल्या काही दिवसांपासून देशातील प्रत्येक भागांमध्ये अमित शहा यांचे दौरे वाढीस लागले आहे. गृहमंत्री म्हणून सुव्यवस्थेचा आढावा घेताना राज्याराज्यांतील अभ्यास अमित शहा करत आहेत.

Comments
Add Comment

‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या मारवाडी मानसिकता थांबवू शकते’

आयसीएआर-सेंट्रल अॅरिड झोन रिसर्चचे संचालक डॉ. तंवर यांचे भाष्य जोधपूर : ऐतिहासिकदृष्ट्या राजस्थान आणि

‘वंदे भारत’साठी जोधपूरमध्ये पहिला देखभाल डेपो

मेंटेनन्सचा विषय निकाली; दिल्ली, मुंबई, बंगळूरुमध्येही होणार उभारणी जोधपूर  : जलद गतीने धावणारी वंदे भारत

सिग्नल ओव्हरशूट! छत्तीसगडमध्ये झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघाताचे कारण आले समोर

छत्तीसगड: छत्तीसगडमधील बिलासपूर येथे काल (४ नोव्हेंबर) सायंकाळी मेमू ट्रेनचा आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला. हा

बिहारमध्ये कमळ फुलणार!

ओपनियन पोलच्या अंदाजानुसार एनडीएचे बिहारमध्ये सरकार नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा ६

मतदार यादी पुनरिक्षणविरोधात 'इंडिया'ची देशव्यापी आंदोलनाची योजना

नवी दिल्ली : 'इंडिया' आघाडीने निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर)

Barabanki Road Accident : वेगमर्यादेचा बळी! बाराबंकीत ट्रक-अर्टिगाच्या धडकेत ६ ठार, ८ गंभीर जखमी; कारचा अक्षरशः चक्काचूर!

बाराबंकी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी (Barabanki) जिल्ह्यात सोमवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाल्याची घटना समोर