मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावर खड्ड्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येते. या द्रुतगती महामार्गावर कायमच वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळतात. सकाळच्या वेळी ९ ते ११ च्या दरम्यान या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. संध्याकाळी ४ नंतर रात्री ११ पर्यंत देखील तीच परिस्थिती असते. सकाळी कार्यालयात जाण्यासाठी आणि संध्याकाळी कार्यालयीन वेळ संपल्याने अनेकजण घरी जाण्याच्या तयारीत असतात. मुख्यमंत्र्यांनी पदभार स्विकारल्यानंतर प्रशासनाला तातडीने खड्डे भरा हा पहिला आदेश दिला होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पहिलाच आदेश अजुनही अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे. अनेक ठिकाणचे खड्डे मृत्यूचे सापळे ठरत आहेत.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हे खड्डे भरण्याचे काम आज सकाळपासून सुरू असल्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हाईवेवर अंधेरीच्या दिशाने जाणा-या मार्गावर वाकोला ते माहिम दरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
जोगेश्वरी, गोरेगाव आणि मालाडमध्ये द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. दीड ते दोन तास या वाहतूक कोंडीमध्ये वाहन चालकांना थांबावे लागत आहे. या वाहतूक कोंडीमध्ये काही रुग्णवाहिका सुद्धा अडकल्याचे दृश्य पाहायला मिळते.
वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक पोलीस वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत.
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…
ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…