पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

  119

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावर खड्ड्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येते. या द्रुतगती महामार्गावर कायमच वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळतात. सकाळच्या वेळी ९ ते ११ च्या दरम्यान या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. संध्याकाळी ४ नंतर रात्री ११ पर्यंत देखील तीच परिस्थिती असते. सकाळी कार्यालयात जाण्यासाठी आणि संध्याकाळी कार्यालयीन वेळ संपल्याने अनेकजण घरी जाण्याच्या तयारीत असतात. मुख्यमंत्र्यांनी पदभार स्विकारल्यानंतर प्रशासनाला तातडीने खड्डे भरा हा पहिला आदेश दिला होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पहिलाच आदेश अजुनही अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे. अनेक ठिकाणचे खड्डे मृत्यूचे सापळे ठरत आहेत.


पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हे खड्डे भरण्याचे काम आज सकाळपासून सुरू असल्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हाईवेवर अंधेरीच्या दिशाने जाणा-या मार्गावर वाकोला ते माहिम दरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.


जोगेश्वरी, गोरेगाव आणि मालाडमध्ये द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. दीड ते दोन तास या वाहतूक कोंडीमध्ये वाहन चालकांना थांबावे लागत आहे. या वाहतूक कोंडीमध्ये काही रुग्णवाहिका सुद्धा अडकल्याचे दृश्य पाहायला मिळते.


वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक पोलीस वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत गिरगाव चौपाटीवर लक्ष्मण हाकेंचं आंदोलन, पाण्यात उभं राहून घोषणाबाजी

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण कमी करू नये, ही मागणी घेऊन लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत.

Sudhir Mungantiwar : हिंदीला विरोध आणि इंग्रजीला आलिंगन! महाराष्ट्राच्या विधानसभेत ९ आमदारांना मराठी नकोशी

विधानसभा अध्यक्षांकडे इंग्रजी कामकाजपत्रिकेची मागणी मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत कामकाजाची पत्रिका

Narayan Rane : घरी बोलवा, मिठ्या मारा; एवढा गवगवा का? राणेंचा एकाचवळी दोन्ही ठाकरे बंधूंवर घणाघात; दिशा सालियन बद्धल काय म्हणाले नारायण राणे?

मुंबई : एकमेकांना घरी बोलवा, जेवा, मिठ्या मारा. पण मराठीसाठी एकत्र येतायत असं भासवण्याचं कारण काय? काय केलं

डॉक्टर तयार करणार की कंपाऊंडर? विधानसभेत निलेश राणेंचा हल्लाबोल!

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची दयनीय स्थिती, आमदार निलेश राणेंचे तीव्र सवाल मंत्री मुश्रीफ यांनी दिले स्वत: पाहणी

जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर? मंत्री आशिष शेलारांशी भेट घेतल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते

'मैदानात उतरण्याआधीच रडणे सोडा, हिंम्मत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या'

मंत्री आशिष शेलार यांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान मुंबई: "खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, मैदानात