रत्नागिरीसाठी वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी – उदय सामंत

  88

रत्नागिरी (हिं.स.) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली असून, समितीही स्थापन करण्यात आली आहे. येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकार्यांचा प्रश्नही सुटणार आहे, असे आमदार उदय सामंत यांनी सांगितले.


माजी मंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत रत्नागिरी दौ-यावर आले असता त्यांनी विविध विकासकामांबाबत आढावा घेतला. याचवेळी मोठ्या संख्येने रत्नागिरी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी सामंत यांची भेट घेऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पाली येथील निवासस्थानी अनेक पदाधिकारी आणि नागरिकांनी त्यांची भेट घेतली. दुपारनंतर सामंत हे रत्नागिरीतील विश्रामगृहावर आले होते. त्यांनी रत्नागिरीत आल्यानंतर बांधकाम विभाग, जिल्हा रुग्णालयासह विविध विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा केली.


विकासकामांबरोबरच जिल्हा रुग्णालयातील समस्या सोडवण्याच्या दृष्टीने त्यांनी मुंबईतील अधिकार्यांशी संपर्क केला. डॉक्टरांची संख्या वाढावी यादृष्टीने आढावा घेतला. जिल्हा रुग्णालयातील भूलतज्ज्ञांचा प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सामंत यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

कोकणात मुसळधार, राजापूर-चिपळूणमध्ये हाहाकार!

मंदिर - घरांमध्ये पाणी शिरले तर रस्ते व पुलांची दुर्दशा रत्नागिरी : जिल्हयात सक्रिय झालेल्या मान्सूनने चांगलाच

रत्नागिरी : तब्बल ३७ वर्षांनी आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरात पुराचे पाणी!

रत्नागिरी : राजापुर तालुक्यात काल रात्रीपासून पावसाचा कहर झाला आहे. श्रीक्षेत्र आडिवरे येथील श्री महाकाली

शॉक लागल्यामुळे १३ वर्षांच्या मुलीचा तडफडून मृत्यू

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली येथे शॉक लागून १३ वर्षांच्या स्वरांगी गिजमचा तडफडून मृत्यू झाला.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण

आगामी स्थािनक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा

आमदार निलेश राणे यांचे आवाहन चिपळूण : कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण यांच वेगळं नातं आहे, ते कधीच तुटू शकत नाही.