रत्नागिरीसाठी वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी – उदय सामंत

  90

रत्नागिरी (हिं.स.) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली असून, समितीही स्थापन करण्यात आली आहे. येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकार्यांचा प्रश्नही सुटणार आहे, असे आमदार उदय सामंत यांनी सांगितले.


माजी मंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत रत्नागिरी दौ-यावर आले असता त्यांनी विविध विकासकामांबाबत आढावा घेतला. याचवेळी मोठ्या संख्येने रत्नागिरी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी सामंत यांची भेट घेऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पाली येथील निवासस्थानी अनेक पदाधिकारी आणि नागरिकांनी त्यांची भेट घेतली. दुपारनंतर सामंत हे रत्नागिरीतील विश्रामगृहावर आले होते. त्यांनी रत्नागिरीत आल्यानंतर बांधकाम विभाग, जिल्हा रुग्णालयासह विविध विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा केली.


विकासकामांबरोबरच जिल्हा रुग्णालयातील समस्या सोडवण्याच्या दृष्टीने त्यांनी मुंबईतील अधिकार्यांशी संपर्क केला. डॉक्टरांची संख्या वाढावी यादृष्टीने आढावा घेतला. जिल्हा रुग्णालयातील भूलतज्ज्ञांचा प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सामंत यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मे महिन्यात लग्न झालेल्या नवविवाहित दाम्पत्याने चिपळूणमध्ये आत्महत्या का केली?

रत्नागिरी : चिपळूण शहरातील गांधारेश्वर पुलावरून दोन दिवसांपूर्वी नदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या नवविवाहित

‘प्लास्टिकमुक्त चिपळूण’ची महिलांच्या पुढाकाराने यशस्वी लढाई

१२ दिवसांत ४३७ किलो प्लास्टिक संकलन चिपळूण : चिपळूण शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण

रत्नागिरी : खेड नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र नूतनीकरण

लोटे एमआयडीसी कारखान्यात स्फोट, एकाचा मृत्यू

रत्नागिरी : लोटे औद्योगिक वसाहतीमधील विनती ऑरगॅनिक प्रा. लि. या रासायनिक उत्पादन करणाऱ्या कंपनीत आज (दि. २६ जुलै)

रत्नागिरी जिल्ह्याला २३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात येत्या २३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज असून नदीकाठी राहणाऱ्यांना

Ratnagiri News: रत्नागिरी येथील आरेवारे समुद्रात ४ पर्यटकांचा बुडून मृत्यू

रत्नागिरी: आरेवारे समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी