दापोलीतील पाच गावांत इंडो-इस्रायल प्रकल्प

रत्नागिरी (प्रतिनिधी) : एकात्मिक फलोत्पादन योजनेंतर्गत इंडो-इस्रायल प्रकल्प राबविण्यासाठी दापोली तालुक्यातील पाच गावांची निवड करण्यात आली आहे. यासाठी १ कोटी ८२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. या प्रकल्पात ४०२ हेक्टरवर घनपध्दतीने लागवड आणि काही बागायतदारांकडील जुन्या बागांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे.


जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून इस्रायल तंत्रज्ञानाचा हापूसमध्ये वापर करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. मागील काही वर्षांमध्ये इंडो-इस्रायल तंत्र वापरण्याकडे आंबा बागायतदारांचा कल वाढलेला आहे. कोकणात उंचच उंच हापूसची झाडे आहेत. त्यामधून अपेक्षित उत्पादनही मिळत नाही. उंच झाडांवरुन आंबे काढण्यासाठी मजुरांची कमतरता आहेच आणि धोकाही तेवढाच आहे. हापूसचे उत्पादन वाढविण्यासाठी कमी उंचीची झाडे आणि घन पध्दतीने रोपांची लागवड करण्यावर बागायतदार भर देत आहेत. याचा विचार करुन कृषी विभागाकडून इंडो-इस्रायल प्रकल्प राबविण्यासाठी दापोली तालुक्यावर लक्ष केंद्रित केले आहे.


त्यामध्ये आंजर्ले, केळशी, कुडावळे, ओणनवसे, कोळथरे या पाच गावांचा समावेश आहे. यामध्ये घन पद्धतीने आंबा लागवडीसाठी ४०२ हेक्टरचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्याचबरोबर जुन्या बागांमधील झाडांची उंची कमी करुन ती दहा फुटांपर्यंत केली जाणार आहे. बागायतदारांना अनुदानावर पॅकहाऊस दिली जाणार असून शेततळं, नवीन यंत्र सामग्रीही अनुदानावर देण्यात येणार आहे. घन पध्दतीने लागवड केलेल्या बागांमध्ये आंतरपिक म्हणून मिरची लागवडीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. सुरुवातीला १ कोटी ६२ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. त्यात दुरुस्ती करुन तो १ कोटी ८२ लाखांचा केला आहे. या योजनेतून ११ लाख रुपये पॅकहाऊसवर खर्च केले आहेत. त्यातून १ पॅकहाऊस उभारले आहे. ११३ बागायतदारांना यांत्रिकीकरणातून २६ लाख रुपये खर्च केले आहेत. शेडनेटवर दीड लाख रुपये तर ५ शेततळ्यांसाठी ५३ लाख रुपये खर्ची केले आहेत. पुढील वर्षभरात या पाच गावांमध्ये योजनेतून निधी खर्ची टाकण्यात येणार आहे.


इंडो-इस्त्रायल प्रकल्पाचा लाभ आंबा बागायतदारांना होणार असून प्रायोगिक तत्त्वावर दापोली तालुक्यातील आंजर्ले, केळशी, कुडावळे, ओणनवसे, कोळथरे या पाच गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये योजनेचे लाभ देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. - सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे चिपळूणमध्ये पुराचा धोका

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण शहराला असलेल्या पुराच्या धोक्याबाबत उपाययोजना सूचविण्यासाठी राज्य सरकारने जलसंपदा

वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश पुन्हा हुकला

मनसेचं 'वैभव' भाजपला केव्हा फळणार? मुंबई : नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न अशी मराठीत म्हण आहे. वैभव खेडेकर यांच्या

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय व

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

समृद्ध पंचायतराज अभियानातून राज्यात सर्वाधिक बक्षिसे मतदार संघाने मिळवावीत: ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम

समृद्ध पंचायतराज अभियानासाठी विशेष प्रयत्न करा दापोली: ग्रामविकास व पंचायतीराज विभागामार्फत राबविण्यात