आचरामधील अपघाती मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून दिलासा


मालवण (प्रतिनिधी) : विजेचा धक्का लागून अपघाती मृत्यू झालेले महावितरण कंपनीचे कंत्राटी कर्मचारी यांना भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यामातून प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत देण्यात आली. सदरील धनादेश भाजप नेते निलेश राणे यांच्या हस्ते मीराशी, मोंडकर कुटुंबियांना गुरुवारी देण्यात आले.


आचरा येथे वीज दुरुस्तीचे काम करत असताना, आनंद मिराशी तर इळये येथे विज दुरुस्तीचे काम करत असताना राकेश मोंडकर यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. या कंत्राटी कामगारांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी यासाठी कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यासह अन्य संघटना पदाधिकारी, भाजप पदाधिकारी यांनी भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून विज वितरण व ठेकेदार एजन्सी यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. पहिल्या टप्प्यात मीराशी कुटुंबीयांना दोन लाख रोख स्वरूपात अडीच लाख रुपये बँक खात्यात जमा झाले होते, तर राकेश मोंडकर यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात अडीच लाख जमा करण्यात आले होते.


प्रत्येकी दहा लाख रुपये मदतीपैकी जमा रक्कम व्यतिरिक्त उर्वरित रकमेचे धनादेश मीराशी, मोंडकर कुटुंबीयांना निलेश राणे यांच्या हस्ते मालवण येथे सुपूर्द करण्यात आले. या वेळी कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, रवी मालवणकर, मोहन कुबल, विजय निकम आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

कर्नाटकमधील मच्छीमारांची महाराष्ट्रात घुसखोरी, सरकारी यंत्रणेची लगेच कारवाई

देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने

Narayan Rane : नारायण राणे यांचं कणकवलीतील युती आणि राज्याच्या विकासावर मोठं भाष्य; राणे म्हणाले उद्धव ठाकरेंशी...

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवली येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत राज्यातील राजकीय आणि

Firecraker Attack On Elephant : क्रूरतेचा कळस! सिंधुदुर्गमध्ये नदीत आंघोळ करणाऱ्या 'ओंकार हत्ती'वर सुतळी बाॅम्बने हल्ला; व्हिडिओ व्हायरल

सिंधुदुर्ग : एका अत्यंत संतापजनक आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेची नोंद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा परिसरात

एआय प्रणालीचा सखोल अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाची विशेष टीम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीचा प्रभावी वापर सुरू केला

जिल्हा व्यवसाय सुधारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना देणार जादा अधिकार!

मुंबई : राज्यात ‘जिल्हा व्यवसाय सुधारणा कृती योजना २०२५’ राबविण्यात येत आहे. १५४ सुधारणांचा समावेश असलेल्या या

वायंगणी कांबळीवाडी समुद्रकिनारी कुजलेल्या अवस्थेत आढळला भला मोठा व्हेल मासा...

वेंगुर्ले: वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी कांबळीवाडी समुद्रकिनारी आज सकाळी भला मोठा व्हेल मासा कुजलेल्या