डोंबिवली, अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये १५ सप्टेंबरपर्यंत टँकर वाहतुकीला बंदी

  134

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये दि. १८ जुलै ते १५ सप्टेंबर २०२२ या कालावधीत संध्याकाळी १८.०० ते सकाळी ०६.०० या कालावधीत सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात आली असल्याची माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली आहे.


पठारे यांनी काढलेल्या मनाई आदेशात नमूद केले आहे की, जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये संध्याकाळी १८.०० वा ते सकाळी ०६.०० वा. या कालावधीत टँकरच्या माध्यमातून धोकादायक केमिकल वाहून नेवून नदीच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होवून लोकांच्या आरोग्यास धोका व नदीतील जैवविविधतेवर परिणाम होतो.


त्यामुळे १८ जुलै ते १५ सप्टेंबर २०२२ या काळात डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी कळविले आहे.

Comments
Add Comment

बांबूच्या चटईतून बाप्पाची शाश्वत आरास

देसले कुटुंबाचा संस्कृतीस्नेही उपक्रम ठाणे : गणेशोत्सव हा फक्त भक्तिभावाचा नव्हे तर संस्कृती, परंपरा आणि

Thane Varsha Marathon Winner: ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉनचे विजेते जाहीर! पुरुष गटात धर्मेंद्र आणि महिला गटात रविना गायकवाड ठरले विजेते

ठाणे,: 'मॅरेथॉन ठाण्याची.. उर्जा तरुणाईची' या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या एकतिसाव्या ठाणे महानगरपालिका

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वाहतूक कोंडीने घेतला जीव! रुग्णवाहिकेतच महिलेचा तडफडून मृत्यू

पालघर: गेल्या काही दिवसांपासून मुंबई-अहमदाबाद मार्गावर कमालीची वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून यात आहे. मात्र

मोरबे धरणाच्या पातळीत घट

नवी मुंबईकरांची वाढली पाण्याची चिंता वाशी : नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या मोरबे धरणाच्या पातळीत

सणासुदीला ठाण्यात वाहतूक कोंडीचा महाकाय विळखा!

ठाणे : रक्षाबंधन सणादरम्यान शनिवारी हजारो प्रवाशांना प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. प्रचंड वाहतूक

दिवाळीत पॉड टॅक्सीचे भूमिपूजन

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी उपाययोजना