रोहा-चिपळूण ‘मेमू’ आता १२ डब्यांची

  202

चिपळूण (वार्ताहर) : यंदा गणेशोत्सवाचे औचित्य साधून कोकण रेल्वे मार्गावर रोह्याच्या पुढे प्रथमच धावणाऱ्या मेमू ट्रेनला अतिरिक्त चार डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार आहे.


आधी ही गाडी आठ डब्यांची जाहीर करण्यात आली होती. १९ ते २१ ऑगस्ट, २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर व १० ते १२ सप्टेंबर २०२२ या दिवशी रोहा- चिपळूण मेमू विशेष गाडी सोडली जाणार आहे. गणेशोत्सवासाठी रोहा-चिपळूण मेमू गाडी आधीच्या दिवा-रोहा गाडीला विस्तारित करुन चालवली जाणार आहे. यामुळे प्रत्यक्षात ही दिवा- रोहा-चिपळूण अशी धावणार आहे. या नुसार ०१३४७ दिवा -रोहा- मेमू सकाळी ८. ४५ ला सुटून सकाळी ११ ला रोहा येथे पोहोचेल. तीच गाडी पुढे ०११५७ रोहा- चिपळूण मेमू म्हणून सकाळी ११.०५ ला सुटून चिपळूणला दुपारी १.२० ला पोहोचेल.


०११५८/०११३४८ चिपळूण -रोहा -दिवा मेमू दुपारी १.४५ ला सुटून संध्याकाळी ४.१० ला रोहयाला पोहोचेल. तीच पुढे०१३४८ रोहा दिवा मेमू म्हणून रोहा येथून ४.१५ ला सुटेल व दिव्याला संध्याकाळी ६.४५ ला पोहोचेल.


दिवा - चिपळूण मार्गावर धावताना मेमू विशेष रेल्वे गाडी दातिवली, निळजे, तळोजे, नावडे, कळंबोली, पनवेल, सोमटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे, खेड या स्थानकांवर थांबे घेणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

कोकणात मुसळधार, राजापूर-चिपळूणमध्ये हाहाकार!

मंदिर - घरांमध्ये पाणी शिरले तर रस्ते व पुलांची दुर्दशा रत्नागिरी : जिल्हयात सक्रिय झालेल्या मान्सूनने चांगलाच

रत्नागिरी : तब्बल ३७ वर्षांनी आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरात पुराचे पाणी!

रत्नागिरी : राजापुर तालुक्यात काल रात्रीपासून पावसाचा कहर झाला आहे. श्रीक्षेत्र आडिवरे येथील श्री महाकाली

शॉक लागल्यामुळे १३ वर्षांच्या मुलीचा तडफडून मृत्यू

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली येथे शॉक लागून १३ वर्षांच्या स्वरांगी गिजमचा तडफडून मृत्यू झाला.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण

आगामी स्थािनक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा

आमदार निलेश राणे यांचे आवाहन चिपळूण : कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण यांच वेगळं नातं आहे, ते कधीच तुटू शकत नाही.