रोहा-चिपळूण ‘मेमू’ आता १२ डब्यांची

चिपळूण (वार्ताहर) : यंदा गणेशोत्सवाचे औचित्य साधून कोकण रेल्वे मार्गावर रोह्याच्या पुढे प्रथमच धावणाऱ्या मेमू ट्रेनला अतिरिक्त चार डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार आहे.


आधी ही गाडी आठ डब्यांची जाहीर करण्यात आली होती. १९ ते २१ ऑगस्ट, २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर व १० ते १२ सप्टेंबर २०२२ या दिवशी रोहा- चिपळूण मेमू विशेष गाडी सोडली जाणार आहे. गणेशोत्सवासाठी रोहा-चिपळूण मेमू गाडी आधीच्या दिवा-रोहा गाडीला विस्तारित करुन चालवली जाणार आहे. यामुळे प्रत्यक्षात ही दिवा- रोहा-चिपळूण अशी धावणार आहे. या नुसार ०१३४७ दिवा -रोहा- मेमू सकाळी ८. ४५ ला सुटून सकाळी ११ ला रोहा येथे पोहोचेल. तीच गाडी पुढे ०११५७ रोहा- चिपळूण मेमू म्हणून सकाळी ११.०५ ला सुटून चिपळूणला दुपारी १.२० ला पोहोचेल.


०११५८/०११३४८ चिपळूण -रोहा -दिवा मेमू दुपारी १.४५ ला सुटून संध्याकाळी ४.१० ला रोहयाला पोहोचेल. तीच पुढे०१३४८ रोहा दिवा मेमू म्हणून रोहा येथून ४.१५ ला सुटेल व दिव्याला संध्याकाळी ६.४५ ला पोहोचेल.


दिवा - चिपळूण मार्गावर धावताना मेमू विशेष रेल्वे गाडी दातिवली, निळजे, तळोजे, नावडे, कळंबोली, पनवेल, सोमटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे, खेड या स्थानकांवर थांबे घेणार आहे.

Comments
Add Comment

कोकणच्या लाल मातीला लागली शिमगोत्सवाची चाहूल

ग्रामदैवतांच्या पालख्या, पारंपरिक नृत्यप्रकार, दशावतारी नाट्यप्रयोगांची तयारी अंतिम टप्प्यात रत्नागिरी :

संगमेश्वर तालुक्यात तीन जि. प. गटांत होणार हायहोल्टेज लढती

साडवली गटात माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांची प्रतिष्ठा पणाला नीलेश जाधव देवरूख : जिल्हा परिषद व पंचायत

सीटीईटी परीक्षार्थी शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्याची मागणी

खेड : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड यांच्यावतीने ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सीटीईटी परीक्षा

गुहागरात युती विरुद्ध उबाठा लढत रंगणार

आशिष कारेकर गुहागर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुहागर तालुक्यातील ५ जिल्हा परिषद व १० पंचायत

अपघातात जखमींना मिळणार कॅशलेस उपचार

प्राण वाचवणाऱ्या मदतनीसालाही २५ हजार रुपये रोख बक्षीस रत्नागिरी : रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी

रत्नागिरी जिल्ह्यावर मळभ व पावसाचे सावट; आंबा-काजू उत्पादन धोक्यात

रत्नागिरी  : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट घोंगावत आहे. जिल्ह्यात पावसाचे