माजी पालकमंत्री अनिल परब यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता?

  90

दापोली (प्रतिनिधी) : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची सहाजणांची टीम मुरुडमधल्या साई रिसॉर्टवर गुरुवारी दिवसभर पाहणी करण्यासाठी दाखल झाली होती. या टीममध्ये चेन्नईमधील पर्यावरण संस्था आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटचे अधिकारी असल्याची माहिती मिळाली आहे. पर्यावरणाच्या हानीची आतापर्यंत काय कारवाई झाली? याची या टीमकडून चौकशी सुरू आहे. सहाजणांच्या टीमकडून ही चौकशी सुरू आहे.


गुरुवारी मुरुड येथील साई रिसॉर्टच्या ठिकाणी जाऊन या टीमने पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रांत, तहसीलदार, सर्कल, तलाठी हे महसूलचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


अनिल परब यांच्या मुरुड मधल्या साई रिसॉर्टकडून सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणी अनेक आरोप सोमय्या यांनी केले आहेत. ही टीम साई रिसॉर्टप्रमाणे सी कोच रिसॉर्टचीदेखील पाहणी करतेय, अशी प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली.


सायंकाळी उशिरा ही टीम दापोली प्रांताधिकारी कार्यालयात दाखल झाली होती. माहिती घेण्याचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, यापूर्वी अनेकदा अनिल परब यांनी सोमय्या यांनी केलेले आरोप फेटाळून लावत आपला साई रिसॉर्टशी कोणताही संबंध नाही, असे यापूर्वी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

कोकणात मुसळधार, राजापूर-चिपळूणमध्ये हाहाकार!

मंदिर - घरांमध्ये पाणी शिरले तर रस्ते व पुलांची दुर्दशा रत्नागिरी : जिल्हयात सक्रिय झालेल्या मान्सूनने चांगलाच

रत्नागिरी : तब्बल ३७ वर्षांनी आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरात पुराचे पाणी!

रत्नागिरी : राजापुर तालुक्यात काल रात्रीपासून पावसाचा कहर झाला आहे. श्रीक्षेत्र आडिवरे येथील श्री महाकाली

शॉक लागल्यामुळे १३ वर्षांच्या मुलीचा तडफडून मृत्यू

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली येथे शॉक लागून १३ वर्षांच्या स्वरांगी गिजमचा तडफडून मृत्यू झाला.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण

आगामी स्थािनक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा

आमदार निलेश राणे यांचे आवाहन चिपळूण : कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण यांच वेगळं नातं आहे, ते कधीच तुटू शकत नाही.