माजी पालकमंत्री अनिल परब यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता?

  86

दापोली (प्रतिनिधी) : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची सहाजणांची टीम मुरुडमधल्या साई रिसॉर्टवर गुरुवारी दिवसभर पाहणी करण्यासाठी दाखल झाली होती. या टीममध्ये चेन्नईमधील पर्यावरण संस्था आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटचे अधिकारी असल्याची माहिती मिळाली आहे. पर्यावरणाच्या हानीची आतापर्यंत काय कारवाई झाली? याची या टीमकडून चौकशी सुरू आहे. सहाजणांच्या टीमकडून ही चौकशी सुरू आहे.


गुरुवारी मुरुड येथील साई रिसॉर्टच्या ठिकाणी जाऊन या टीमने पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रांत, तहसीलदार, सर्कल, तलाठी हे महसूलचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


अनिल परब यांच्या मुरुड मधल्या साई रिसॉर्टकडून सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणी अनेक आरोप सोमय्या यांनी केले आहेत. ही टीम साई रिसॉर्टप्रमाणे सी कोच रिसॉर्टचीदेखील पाहणी करतेय, अशी प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली.


सायंकाळी उशिरा ही टीम दापोली प्रांताधिकारी कार्यालयात दाखल झाली होती. माहिती घेण्याचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, यापूर्वी अनेकदा अनिल परब यांनी सोमय्या यांनी केलेले आरोप फेटाळून लावत आपला साई रिसॉर्टशी कोणताही संबंध नाही, असे यापूर्वी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Konkan Railway : कोकणवासीयांसाठी दिलासा! गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची कार 'रो रो' सेवा होणार सुरु

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणा-या रेल्वे रो रो सेवेमधून आता ट्रक प्रमाणे चारचाकी कार गाड्यांची ही रो रो

मुंबई-गोवा महामार्ग कामात दिरंगाई व हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही

खासदार नारायण राणे यांच्याकडून अधिकाऱ्यांना सूचना रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे काम ठेकेदार गांभीर्याने

Mumbai-Goa highway : कशेडी घाटात भेगा, नव्या मुंबई-गोवा महामार्गावर भूस्खलनाचा धोका वाढला

पोलादपूर : जुन्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वरील कशेडी घाटात भेगा पडल्याने आणि मंगळवारी सायंकाळी

शक्ती चक्रीवादळाचा कहर! कोकणात रेड अलर्टचा इशारा

रत्नागिरी : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून,

दापोली-खेड रस्ता बंद! जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा इशारा

खेड : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, त्याचा परिणाम दापोली-खेड प्रमुख राज्य मार्गावर दिसून

Nitesh Rane: रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात ३,३९६ मेट्रिक टनने वाढ

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या ऐतिहासिक निणर्याचे सकारात्मक परिणाम रत्नागिरी: ड्रोन सर्वेक्षण, अवैध