माजी पालकमंत्री अनिल परब यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता?

  96

दापोली (प्रतिनिधी) : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची सहाजणांची टीम मुरुडमधल्या साई रिसॉर्टवर गुरुवारी दिवसभर पाहणी करण्यासाठी दाखल झाली होती. या टीममध्ये चेन्नईमधील पर्यावरण संस्था आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटचे अधिकारी असल्याची माहिती मिळाली आहे. पर्यावरणाच्या हानीची आतापर्यंत काय कारवाई झाली? याची या टीमकडून चौकशी सुरू आहे. सहाजणांच्या टीमकडून ही चौकशी सुरू आहे.


गुरुवारी मुरुड येथील साई रिसॉर्टच्या ठिकाणी जाऊन या टीमने पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रांत, तहसीलदार, सर्कल, तलाठी हे महसूलचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


अनिल परब यांच्या मुरुड मधल्या साई रिसॉर्टकडून सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणी अनेक आरोप सोमय्या यांनी केले आहेत. ही टीम साई रिसॉर्टप्रमाणे सी कोच रिसॉर्टचीदेखील पाहणी करतेय, अशी प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली.


सायंकाळी उशिरा ही टीम दापोली प्रांताधिकारी कार्यालयात दाखल झाली होती. माहिती घेण्याचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, यापूर्वी अनेकदा अनिल परब यांनी सोमय्या यांनी केलेले आरोप फेटाळून लावत आपला साई रिसॉर्टशी कोणताही संबंध नाही, असे यापूर्वी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

मे महिन्यात लग्न झालेल्या नवविवाहित दाम्पत्याने चिपळूणमध्ये आत्महत्या का केली?

रत्नागिरी : चिपळूण शहरातील गांधारेश्वर पुलावरून दोन दिवसांपूर्वी नदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या नवविवाहित

‘प्लास्टिकमुक्त चिपळूण’ची महिलांच्या पुढाकाराने यशस्वी लढाई

१२ दिवसांत ४३७ किलो प्लास्टिक संकलन चिपळूण : चिपळूण शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण

रत्नागिरी : खेड नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र नूतनीकरण

लोटे एमआयडीसी कारखान्यात स्फोट, एकाचा मृत्यू

रत्नागिरी : लोटे औद्योगिक वसाहतीमधील विनती ऑरगॅनिक प्रा. लि. या रासायनिक उत्पादन करणाऱ्या कंपनीत आज (दि. २६ जुलै)

रत्नागिरी जिल्ह्याला २३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात येत्या २३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज असून नदीकाठी राहणाऱ्यांना

Ratnagiri News: रत्नागिरी येथील आरेवारे समुद्रात ४ पर्यटकांचा बुडून मृत्यू

रत्नागिरी: आरेवारे समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी