पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलैऐवजी ३१ जुलै रोजी

रत्नागिरी (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) येत्या २० जुलैऐवजी ३१ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.


ही परीक्षा २० जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होती. मात्र सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश स्थिती उद्भवली आहे. बहुतांश ठिकाणी भूस्खलनामुळे वाहतूक बंद आहे.


त्यामुळे विद्यार्थ्यांना दळणवळणात येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थी हित आणि त्यांची सुरक्षा लक्षात घेता परीक्षा पुढे घेतली जाणार आहे. यापूर्वी दिलेले प्रवेशपत्र ३१ जुलै रोजी परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आयुक्तांनी कळविल्याची माहिती येथील जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.

Comments
Add Comment

संगमेश्वर तालुक्यात तीन जि. प. गटांत होणार हायहोल्टेज लढती

साडवली गटात माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांची प्रतिष्ठा पणाला नीलेश जाधव देवरूख : जिल्हा परिषद व पंचायत

सीटीईटी परीक्षार्थी शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्याची मागणी

खेड : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड यांच्यावतीने ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सीटीईटी परीक्षा

गुहागरात युती विरुद्ध उबाठा लढत रंगणार

आशिष कारेकर गुहागर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुहागर तालुक्यातील ५ जिल्हा परिषद व १० पंचायत

अपघातात जखमींना मिळणार कॅशलेस उपचार

प्राण वाचवणाऱ्या मदतनीसालाही २५ हजार रुपये रोख बक्षीस रत्नागिरी : रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी

रत्नागिरी जिल्ह्यावर मळभ व पावसाचे सावट; आंबा-काजू उत्पादन धोक्यात

रत्नागिरी  : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट घोंगावत आहे. जिल्ह्यात पावसाचे

मंडणगडमध्ये दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढतीने वाढवली निवडणुकीची उत्कंठा

मंडणगड : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांना ६-० असा