पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलैऐवजी ३१ जुलै रोजी

रत्नागिरी (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) येत्या २० जुलैऐवजी ३१ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.


ही परीक्षा २० जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होती. मात्र सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश स्थिती उद्भवली आहे. बहुतांश ठिकाणी भूस्खलनामुळे वाहतूक बंद आहे.


त्यामुळे विद्यार्थ्यांना दळणवळणात येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थी हित आणि त्यांची सुरक्षा लक्षात घेता परीक्षा पुढे घेतली जाणार आहे. यापूर्वी दिलेले प्रवेशपत्र ३१ जुलै रोजी परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आयुक्तांनी कळविल्याची माहिती येथील जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.

Comments
Add Comment

मार्लेश्वर मंदिराजवळ नदीपात्रात सुरुंग स्फोट

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्लेश्वर मंदिराजवळ नदीपात्रात सुरुंग स्फोट केले जात आहेत. मात्र,

लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीला टाळे ठोका

स्थानिकांचा कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर घुमला आवाज चिपळूण :  टाळे ठोका, टाळे ठोका, लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीला टाळे

श्री दशभूज लक्ष्मी गणेश देवस्थान ट्रस्टच्या वतीने २२ जानेवारीपासून माघी जन्मोत्सव

चिपळूण : श्री. दशभूज लक्ष्मी गणेश देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री दशभूज लक्ष्मी गणेशांचा माघी जन्मोत्सव गुरुवार

कृषी महोत्सवात कोकणी परंपरा आणि कृषी संस्कृतीची ओळख

वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने जपले सामाजिक दायित्व संतोष सावर्डेकर चिपळूण : वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित कृषी

रत्नागिरीत होणार ‘संसद खेल रत्न क्रीडा महोत्सव’ : खा. नारायण राणे

भाजप नेते प्रशांत यादव यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी चिपळूण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रत्नागिरीचा झेंडा फडकला

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा विश्वासाठी अभिमानास्पद ठरणारी कामगिरी करत रत्नदुर्ग पिस्टल आणि