रत्नागिरी (हिं.स.) : पाचांबे नेरदवाडी (ता.संगमेश्वर) येथील संजय महीपत जाधव यांच्या गुरांच्या गोठ्यावर वीज पडल्याने लागलेल्या आगीत १३ म्हशींचा जळून मृत्यू झाला. आगीत गोठा भस्मसात झाला आहे.
याबाबतची माहिती मिळताच गोठ्याचे तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश संगमेश्वरचे तहसीलदार सुहास थोरात यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना दिले. गोठ्यावर वीज पडून गोठ्यातील वाळलेल्या चाऱ्याने पेट घेतला. त्यामुळे गोठ्याला आग लागल्याचे पंचांनी सांगितले.
आगीत ६ मोठ्या, ३ लहान म्हशी, दोन रेडे आणि दोन वासरांचा जळून मृत्यू झाला. या घटनेत श्री. जाधव यांचे सुमारे दहा लाखाचे नुकसान झाले आहे.
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…