रत्नागिरीत वीज पडून लागलेल्या आगीत १३ म्हशींचा मृत्यू

  86

रत्नागिरी (हिं.स.) : पाचांबे नेरदवाडी (ता.संगमेश्वर) येथील संजय महीपत जाधव यांच्या गुरांच्या गोठ्यावर वीज पडल्याने लागलेल्या आगीत १३ म्हशींचा जळून मृत्यू झाला. आगीत गोठा भस्मसात झाला आहे.


याबाबतची माहिती मिळताच गोठ्याचे तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश संगमेश्वरचे तहसीलदार सुहास थोरात यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना दिले. गोठ्यावर वीज पडून गोठ्यातील वाळलेल्या चाऱ्याने पेट घेतला. त्यामुळे गोठ्याला आग लागल्याचे पंचांनी सांगितले.


आगीत ६ मोठ्या, ३ लहान म्हशी, दोन रेडे आणि दोन वासरांचा जळून मृत्यू झाला. या घटनेत श्री. जाधव यांचे सुमारे दहा लाखाचे नुकसान झाले आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण