सिंधुदुर्गातील अनेक मार्ग पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा जोर वाढला आहे. दिवसभर पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे नदीनाल्याना पूर आला आहे. अनेक मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.



बांद्याजवळ तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी आल्याने बांदा-दाणोली मार्ग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहतूक सकाळपासून बंद आहे. वेंगुर्ले-सावंतवाडी या मुख्य मार्गावर तळवडा आणि मातोंडला जोडला जाणाऱ्या होडावडा पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक आज सकाळ पासून पूर्णतः ठप्प झाली आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी या परिस्थितीची पाहणी केली.



सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दोडामार्ग तालुक्यांतील नदी नाले तुडुंब भरले आहेत. अनेक ठिकाणी छोटे छोटे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्या मार्गावरची वाहतूक बंद पडल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. एनडीआरएफची टीम आज दोडामार्गमध्ये दाखल झाली आहे.त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे.


समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा


प्रादेशिक हवामान विभाग, कुलाबा, मुंबई यांच्याकडून दि. ८ जुलै ते १२ जुलै २०२२ या कालावधीत ६५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच ५.३ ते ४.२ मीटर उंचीच्या लाटा समुद्र किनाऱ्यावर उसळण्याची शक्यता आहे.



तरी समुद्र किनारी आणि खाडी किनारी राहणाऱ्या सर्व मच्छिमार आणि नागरिकांनी सतर्क रहावे. तसेच कोणीही मासेमारीसाठी जाऊ नये व मासेमारी बंदी कालावधीचे काटेकोर पालन करावे. कोणतीही जीवित व वित्तहानी होणार नाही याबाबत दक्षाता घेण्याचे आवाहन चि.सं.जोशी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय अधिकारी, परवाना विभाग, वेंगुर्ला यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका