सिंधुदुर्गातील अनेक मार्ग पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा जोर वाढला आहे. दिवसभर पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे नदीनाल्याना पूर आला आहे. अनेक मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.



बांद्याजवळ तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी आल्याने बांदा-दाणोली मार्ग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहतूक सकाळपासून बंद आहे. वेंगुर्ले-सावंतवाडी या मुख्य मार्गावर तळवडा आणि मातोंडला जोडला जाणाऱ्या होडावडा पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक आज सकाळ पासून पूर्णतः ठप्प झाली आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी या परिस्थितीची पाहणी केली.



सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दोडामार्ग तालुक्यांतील नदी नाले तुडुंब भरले आहेत. अनेक ठिकाणी छोटे छोटे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्या मार्गावरची वाहतूक बंद पडल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. एनडीआरएफची टीम आज दोडामार्गमध्ये दाखल झाली आहे.त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे.


समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा


प्रादेशिक हवामान विभाग, कुलाबा, मुंबई यांच्याकडून दि. ८ जुलै ते १२ जुलै २०२२ या कालावधीत ६५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच ५.३ ते ४.२ मीटर उंचीच्या लाटा समुद्र किनाऱ्यावर उसळण्याची शक्यता आहे.



तरी समुद्र किनारी आणि खाडी किनारी राहणाऱ्या सर्व मच्छिमार आणि नागरिकांनी सतर्क रहावे. तसेच कोणीही मासेमारीसाठी जाऊ नये व मासेमारी बंदी कालावधीचे काटेकोर पालन करावे. कोणतीही जीवित व वित्तहानी होणार नाही याबाबत दक्षाता घेण्याचे आवाहन चि.सं.जोशी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय अधिकारी, परवाना विभाग, वेंगुर्ला यांनी केले आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या

सिंधुदुर्ग ठरणार एआय मॉडेल, मंत्री नितेश राणेंचे स्वप्न पूर्ण होणार

सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे एआय युग आहे. प्रशासनही एआय तंत्रज्ञानाचा वापर करतंय आणि वेगाने विकास होतोय!

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय व