दापोली तालुक्यातील ग्रामस्थांना स्थलांतराच्या सूचना

  126

रत्नागिरी (हिं.स.) : दापोली तालुक्यातील आसूद, मुरूड, कर्देतील ग्रामस्थांना दापोली प्रशासनाने स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत. दोन दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस बरसत असून दापोली प्रांत अधिकारी शरद पवार, दापोली तहसीलदार वैशाली पाटील, मंडल अधिकारी सुदर्शन खानविलकर यांनी नागरिकांना स्थलांतरित होण्यासाठी सूचित केले आहे.


या गावांना भेटी देऊन ज्या ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणच्या नागरिकांना सतर्क केले आहे. आगामी चार दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर असेल. त्यामुळे दापोली प्रशासनाने याबाबत नागरिकांना स्थलांतर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.


आसूद काजरेवाडीतील ग्रामस्थांना यावर्षीदेखील सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना दापोली प्रशासनाने केल्या आहेत. दापोली तहसीलदार वैशाली पाटील यांनी तालुक्यातील ज्या घरांना पावसाळ्यात धोका पोहोचू शकतो, अशा घरांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. यावेळी आसूद सरपंच कल्पेश कडू, उपसरपंच राकेश माने, कोतवाल विकास गुरव, ग्रामविकास अधिकारी गौरत उपस्थित होते.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण