दापोली तालुक्यातील ग्रामस्थांना स्थलांतराच्या सूचना

  132

रत्नागिरी (हिं.स.) : दापोली तालुक्यातील आसूद, मुरूड, कर्देतील ग्रामस्थांना दापोली प्रशासनाने स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत. दोन दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस बरसत असून दापोली प्रांत अधिकारी शरद पवार, दापोली तहसीलदार वैशाली पाटील, मंडल अधिकारी सुदर्शन खानविलकर यांनी नागरिकांना स्थलांतरित होण्यासाठी सूचित केले आहे.


या गावांना भेटी देऊन ज्या ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणच्या नागरिकांना सतर्क केले आहे. आगामी चार दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर असेल. त्यामुळे दापोली प्रशासनाने याबाबत नागरिकांना स्थलांतर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.


आसूद काजरेवाडीतील ग्रामस्थांना यावर्षीदेखील सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना दापोली प्रशासनाने केल्या आहेत. दापोली तहसीलदार वैशाली पाटील यांनी तालुक्यातील ज्या घरांना पावसाळ्यात धोका पोहोचू शकतो, अशा घरांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. यावेळी आसूद सरपंच कल्पेश कडू, उपसरपंच राकेश माने, कोतवाल विकास गुरव, ग्रामविकास अधिकारी गौरत उपस्थित होते.

Comments
Add Comment

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल

खेड जवळील मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला भीषण आग, प्रवासी थोडक्यात बचावले

खेड मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ रविवारी (दि. २४) पहाटे २.१० वाजता लक्झरी बसला भीषण आग लागल्याची घटना