मुसळधार पावसामुळे वैभववाडीत रेल्वे रुळावर पाणी; वाहतूक संथ गतीने

सिंधुदुर्ग (हिं.स.) : वैभववाडी तालुक्यात दिवसभर मुसळधार पाऊस पडतो आहे. या पावसाने तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. वैभववाडी रेल्वे स्टेशन नजीक रुळावर पाणी भरल्याने रेल्वे वाहतूक संथ गतीने सुरू होती. वैभववाडी–तळेरे मार्गावर ठिकठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे वाहतूक विस्कळित झाली होती. त्याचबरोबर उंबर्डे–वैभववाडी मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पावसाचा फटका करुळ घाटमार्गाला देखील बसला. करुळ घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या. मात्र वाहतूक सुरू आहे.


वैभववाडी तालुक्यात पावसाने आज दाणादाण उडविली. तालुक्यातील सुख व शांती या प्रमुख नद्या चालू वर्षी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहत होत्या. मुसळधार पडणाऱ्या पावसाचा फटका रेल्वे प्रशासनालाही बसला. वैभववाडी रेल्वे स्टेशन नजीक रुळावर पाणी भरले होते. दोन्ही रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले होते. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती. मात्र काही काळाने पाणी ओसरले. त्याचबरोबर तळेरे – वैभववाडी मार्गावर घंगाळे नजीक रस्त्यावर पाणी आले होते.


त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. वैभवाडी – उंबर्डे मार्गावर सोनाळी नजीक रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र दुपारनंतर वाहतूक पुर्ववत झाली. करुळ घाटाला पावसाचा सर्वात जास्त फटका बसला. पावसात घाटातील गटारे मातीने भरून गेल्याने ठिकठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्याचबरोबर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. मात्र मार्ग चालू होता. नापणे येथील एका घरात पाणी घुसल्याने घरातील व्यक्तींची तारांबळ उडाली. सायंकाळी पावसाचा जोर ओसरला. त्यानंतर जनजीवन सुरळीत झाले.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात