हैदराबाद नव्हे भाग्यनगर ....

हैदराबाद (वृत्तसंस्था) : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठक हैदराबाद येथे सुरू असून रविवारी बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात हैदराबादचा उल्लेख भाग्यनगर असा केला. ते म्हणाले की, भाग्यनगरमध्येच सरदार पटेलांनी ‘एक भारत’चा नारा दिला होता. मोदी म्हणाले की, ‘आम्ही तुष्टीकरण संपवून तृप्तीकरणाचा मार्ग स्वीकारला आहे. आमची एकच विचारधारा आहे, नेशन फर्स्ट. आमचा एकच कार्यक्रम आहे, नेशन फर्स्ट’.


पीयूष गोयल यांना जेव्हा पत्रकार परिषदेत विचारण्यात आले की भाजप सत्तेत आल्यास हैदराबादचे नाव बदलून ‘भाग्यनगर’ करणार का? त्यावर त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह पक्षाचे मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, असे सांगितले.


उल्लेखनीय म्हणजे ‘आरएसएस’ हैदराबादला ‘भाग्यनगर’ म्हणत आहे आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान ‘भाग्यनगर’ असाच उल्लेख केला होता. नोव्हेंबर २०२० मध्ये, जेव्हा योगी आदित्यनाथ महापौरपदाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी हैदराबादला आले होते, तेव्हा त्यांनी जाहीरपणे सांगितले होते, की भाजप सत्तेत आल्यास शहराचे नाव ‘भाग्यनगर’ केले जाईल.


त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नागरी निवडणुकांच्या प्रचारासाठी हैदराबादला गेले होते आणि तेथे त्यांनी ‘भाग्यनगर’ मंदिराला भेट देऊन दिवसाची सुरुवात केली. हे मंदिर ४२९ वर्षे जुने असून हैदराबाद शहरातील चारमिनारला लागून आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी केली आहे.


तेलंगणामध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संघटित पद्धतीने आयोजित करण्याच्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधानांनी तेलंगणा भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि सर्व प्रतिकूलतेच्या विरोधात भाजप आणि त्यांची दृष्टी सामान्य माणसांपर्यंत नेण्याच्या प्रयत्नांबद्दल त्यांचे अभिनंदन केले.


पंतप्रधानांच्या भाषणाची माहिती देताना रविशंकर प्रसाद म्हणाले, अनेक राज्यांमध्ये कार्यकर्ते सत्तेशिवाय काम करत आहेत. बंगाल, केरळ, तेलंगणामध्ये हे घडत आहे. आमची विचारसरणी लोकशाही आहे. जेव्हा पीएम म्युझियम बांधले गेले तेव्हा आम्ही सर्व पंतप्रधानांना तिथे जागा दिली. आमच्यावर अत्याचार करणाऱ्या अशा पंतप्रधानांचाही त्यात समावेश आहे.


अनेक राजकीय पक्ष आपले अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ही घसरण आपल्यासाठी उपहासाची किंवा विनोदाची बाब नाही. आपण शिकले पाहिजे की त्याने केलेल्या कोणत्याही गोष्टी करण्याची आपल्याला गरज नाही. पंतप्रधानांनी भारतातील विविधतेवर भर दिला आणि सर्वांना भाजपशी जोडण्यावर भर दिला.

Comments
Add Comment

Bharat Bandh: केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

मुंबई : विविध कामगार संघटनांनी आज, गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर

Crime: प्रिन्सिपल सुनेसोबत सासऱ्याचे नको ते प्रकार, नात्याला काळिमा फासणारी घटना समोर

मुंबई: नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या एका प्रतिष्ठित

Vande Mataram : शाळांपासून संसदेपर्यंत आता संपूर्ण 'वंदे मातरम्' घुमणार! केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, सर्व ६ कडवी आता अनिवार्य

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची ठिणगी टाकणाऱ्या 'वंदे मातरम्' या गीताचा सन्मान वाढवण्यासाठी

Sunetra Pawar : दिल्लीत राजकीय खलबतं! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोदी-शाहांच्या भेटीला, तर रोहित पवारही राजधानीत

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र आज मुंबईहून देशाची राजधानी दिल्लीत सरकले आहे. राज्याच्या

Rohit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात नव्हे घातपात!

- रोहित पवार यांनी व्यक्त केला संशय; पूर्व विदर्भातील नेत्याच्या फाईलवर सही करण्यास उशीर झाल्याने करावा लागला

EPFO 3.0 : नोकरदारांसाठी मोठी बातमी : आता पीएफचे पैसे मिळतील एका क्लिकवर, 'ही' आहे महत्त्वाची तारीख!

नवी दिल्ली : देशातील सुमारे ८ कोटी नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्मचारी