Bharat Bandh: केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

मुंबई : विविध कामगार संघटनांनी आज, गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नव्या कामगार कायद्यांविरोधात आणि काही आर्थिक धोरणांच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे.


संपामध्ये देशातील १० प्रमुख केंद्रीय ट्रेड युनियनचा सहभाग असून INTUC, AITUC, HMS, CITU यांसह इतर संघटनांनी कामगारांच्या हक्कांबाबत चिंता व्यक्त केली आहे. नव्या लेबर कोडमुळे नोकरीची सुरक्षितता कमी होईल, कंपन्यांना कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे स्वातंत्र्य वाढेल आणि किमान वेतन तसेच सामाजिक सुरक्षेवर परिणाम होईल, असा आरोप संघटनांनी केला आहे.


केंद्र सरकारने गेल्या वर्षी २९ कामगार कायद्यांच्या जागी लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. संयुक्त किसान मोर्चा आणि अखिल भारतीय किसान सभा यांसारख्या शेतकरी संघटनांनी या संपाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. तर ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनसह प्रमुख बँक संघटनांनी या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आज दुपारी २ वाजता देशभरात संघटनांकडून आंदोलन केलं जाणार आहे.



संपामागील कारणं आणि मागण्या काय?


- केंद्र सरकारने गेल्यावर्षी २९ कामगार कायद्यांच्या जागी लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांविरुद्ध कामगार संघटनांनी हा एल्गार पुकारला आहे.


- नवीन संहितांमुळे कामगारांचे हक्क कमकुवत होणार असून नोकरीची सुरक्षितता धोक्यात येणार आहे.


- याव्यतिरिक्त, खासगीकरण, वेतनातील तफावत, वीज दुरुस्ती विधेयक, बियाणे विधेयकाचा मसुदा आणि 'पीस' कायदा रद्द करावा.


- मनरेगा योजना पुनर्संचयित करण्याची मागणीही लावून धरण्यात आली आहे.



'या' सेवांवर होणार मोठा परिणाम:


१) बँकिंग सेवाः प्रमुख बँक संघटना संपात सामील झाल्यामुळे बँक व्यवहारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, बँका अधिकृतपणे बंद नसून ऑनलाईन व्यवहार आणि एटीएम सेवा सुरू राहतील.


२) वाहतूक सेवाः बस, रिक्षा आणि ट्रक चालक संघटनांच्या सहभागामुळे प्रमुख शहरांमध्ये वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.


3) बाजारपेठ आणि व्यापारः घाऊक आणि किरकोळ बाजारपेठांमधील व्यापारी संघटनांनी संपाला नैतिक पाठिंबा दिल्याने अनेक ठिकाणी दुकाने बंद राहू शकतात.


४) शिक्षण संस्थाः वाहतुकीच्या समस्या आणि सुरक्षिततेचे कारण लक्षात घेता, काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली.



काय सुरू राहणार?


- रुग्णवाहिका आणि रुग्णालये


- अग्निशमन दल


- विमान सेवा


- दूध आणि भाजीपाला पुरवठा

Comments
Add Comment

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांवर आक्षेपार्ह टिप्पणी, न्यायमूर्तींसमोर गोंधळ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान एका वकिलाने न्यायालयीन शिष्टाचाराचे उल्लंघन करत

National Anthem : राष्ट्रगीत गायनासंदर्भात नवीन नियमावलीच योग्य क्रम, अचूक शब्द आणि स्पष्ट उच्चार यांचे काटेकोरपणे पालन अनिवार्य

नवी दिल्ली : केंद्रीत गृह मंत्रालयाने राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान गायनासंदर्भात सर्व राज्य सरकारे, केंद्रशासित

Wardrobe Essentials : स्टायलिश दिसायचंय? मग वॉर्डरोबमध्ये या '८' गोष्टी हव्याच!

प्रत्येक मुलीने वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत 'हे' ८ फॅशन Essentials काही फॅशन Essentials तुमचे रोजचे स्टायलिंग खूपच सोपे

Mahadev Betting App : महादेव ॲप सट्टेबाजी प्रकरणी सीबीआयकडून ११ आरोपपत्रे दाखल

नवी दिल्ली: महादेव ॲप ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने गुरुवारी एक मोठी कारवाई करत

PM Narendra Modi in Melbourne : ऑपरेशन सिंदूर’चा डंका जगभर, मेलबर्नमध्ये ३० हजार भारतीयांसमोर पंतप्रधान मोदींचा ठाम संदेश

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी मेलबर्न

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतली ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांची भेट

मेलबर्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी मेलबर्न