प्रेम प्रकरणातून वाद, माय-लेकींची हत्या करत स्वतः केली आत्महत्या

  85

मुंबई (हिं.स.) : पश्चिम उपनगरातील कांदिवली परिसरात एका चालकाने आपली मालकीण आणि तिच्या दोन मुलींची हत्या केली आणि त्यानंतर आत्महत्या करून स्वत:चे आयुष्य संपवल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी आणि शिवदयाल सेन अशी मृतांची नावे आहेत. चालक शिवदयाल सेन याने तिघींचा गळा दाबून खून केला.


अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या कुटुंबातील आई आणि दोन मुलींची त्यांच्याच चालकाने हत्या केली. खून करण्यासाठी चालकाने धारदार शस्त्राचा वापर केला. यानंतर चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. चालक आणि मृतांमधील धाकटी मुलगी यांच्यात प्रेमाचे संबंध होते. यावरून आई, मुलगी आणि चालकामध्ये वाद झाला. यानंतर चालकाने पहिल्यांदा आईची हत्या केली, मग दोन्ही बहिणींचा खून करून स्वत:चे देखील आयुष्य संपवले.


कांदिवली परिसरातील देना बँक जंक्शन येथे ही घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिसरात शोध घेतला. तेव्हा रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर रक्ताच्या थारोळ्यात दोन महिलांचे मृतदेह आढळून आल्याने परिसराची झडती घेण्यात आली. पहिल्या मजल्यावरही शोध घेतला असता तेथे दोन व्यक्ती लटकलेल्या अवस्थेत आढळल्या.


अधिक तपासात पोलिसांना चालक शिवदयाल सेन याच्या कपड्यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली. ज्यात त्याने लिहिले आहे की, माझे भूमीवर प्रेम आहे. परंतु आमचे संबंध मान्य नसल्यामुळे मी तिघींचा खून करून स्वत:चे आयुष्य संपवले. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवले आहे. कांदिवली पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.