Categories: क्रीडा

टी २० मालिकेत भारताची आयर्लंडवर मात

Share

डब्लिन (हिं.स.) : भारत आणि आयर्लंड यांच्यात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने आयर्लंडवर ४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने २-० ने आघाडी घेत मालिकाही आपल्या नावे केली आहे.

या आधी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने आयर्लंडवर विजय मिळवला होता. त्यानंतर मंगळवारी झालेल्या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने प्रथम फलंदाजी करत यजमानांना २२८ धावांचे आव्हान दिले होते. दीपक हुडाचे धडाकेबाज शतक आणि संजू सॅमसनच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने २० षटकांमध्ये सात गडी गमावून २२७ धावा केल्या होत्या.

भारताचा सलामीवीर ईशान किशन तीन धावा करून बाद झाला. मार्क अडायरच्या चेंडूवर तो बाद झाला. पॉवर प्ले अखेरीस भारताने एक बाद ५४ धावांपर्यंत मजल मारली आहे. संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा भारतीय डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. दीपक हुड्डाने २७ चेंडूत शानदार अर्धशतक झळकावले आणि पुढे अवघ्या ५५ चेंडूंमध्ये शतकी कामगिरीही केली. शतकवीर दीपक हुड्डा १०४ धावांवर बाद झाला. जोशुआ लिटीलच्या चेंडूवर तो बाद झाला. आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे.

त्याच्या पाठोपाठ सलामीवीर संजू सॅमसनने देखील ३१ चेंडूमध्ये ५० धावा पूर्ण केल्या. सूर्यकुमार यादव १५ धावा करून तंबूत परतला. भारताचा धडाकेबाज फलंदाज दिनेश कार्तिक शून्यावर बाद झाला. क्रेग यंगने त्याला स्वस्तात माघारी धाडले. अक्षर पटेलदेखील शून्यावर बाद झाला. क्रेग यंगच्या गोलंदाजीवर जॉर्ज डॉकरेलने त्याचा झेल टिपला. आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग रवी बिश्नोईच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्याने केवळ १८ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. हॅरी टेक्टर ३९ धावा करून बाद झाला.

भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर दीपक हुड्डाने त्याचा झेल घेतला. यजमानांना १७ चेंडूंत ३७ धावांची आवश्यकता आहे. लोर्कन टकर पाच धावा करून बाद झाला. उमरान मलिकच्या चेंडूबर बदली क्षेत्ररक्षक म्हणून आलेल्या युझवेंद्र चहलने त्याचा झेल टिपला. त्यामुळे उमरान मलिकने पहिला आंतरराष्ट्रीय बळी आपल्या नावावर केला. आयर्लंडचा कर्णधार बलबर्नीने ३४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर रवी बिश्नोईने त्याचा झेल टिपला.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

5 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

6 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

6 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

7 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

8 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

8 hours ago