उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या गटाचे नाव ‘शिल्लक सेना’ करावे

  61

मुंबई (प्रतिनिधी) : आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत इतके आमदार निघून गेले आहेत की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता स्वतःच्या गटाचे नाव ‘शिवसेना’ ऐवजी ‘शिल्लक सेना’ करून घ्यावे, अशा शब्दांत भाजप नेते निलेश राणे उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला.


निलेश राणे यांनी आणखी एक ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, रोड टेस्टची वार्ता करू नका, बदल्यात हॉकी टेस्ट मिळेल. संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी बोलताना रोड टेस्ट आणि फ्लोअर टेस्टमध्ये आम्हीच विजयी होणार, असे म्हटले होते. त्यावर निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले.


एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सुमारे ४० आमदारांनी बंड केल्याने राज्य सरकार धोक्यात आले आहे. महाराष्ट्रातील झपाट्याने बदलणाऱ्या राजकीय घडामोडी आणि राजकीय संकट सातत्याने धक्कादायक आणि लक्षवेधी वळणे घेत आहेत. आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारून काहीच दिवस झाले असून राज्यामधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड