मुंबईतील शिवसेनेचे ५ आमदार शिंदेंसोबत

  70

सीमा दाते


मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आजच्या परिस्थितीत शिवसेनेचे ४० आमदार शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे मविआचे सरकार हलले असताना आता शिवसेनेला मुंबई महापालिकेची देखील चिंता लागली आहे. मुंबईतील शिवसेनेचे पाच आमदार सध्या शिंदे यांच्या सोबत आहेत. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत याचा मोठा तोटा शिवसेनेला होण्याची शक्यता आहे. मुंबईतील काही नगरसेवकांचा गट देखील फुटण्याच्या तयारीत असल्याचे समजते.


एकनाथ शिंदे यांच्या सोबत मुंबईतील पाच आमदार आहेत. यात बोरिवली येथील आमदार प्रकाश सुर्वे, भायखळ्याच्या यामिनी जाधव, चांदीवली विधानसभेचे दिलीप लांडे, दादर - माहिम विधानसभेचे सदा सरवणकर, कुर्ला येथील आमदार मंगेश कुडाळकर हे शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला याचा धक्का बसण्याची शक्यता आहे.

गेल्या चार वर्षांपासून स्थायी समितीपद भूषविलेले माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी देखील शिंदे गटात सहभागी झाल्या आहेत. यशवंत जाधव यांचा देखील नगरसेवकांचा गट आहे. हा गट देखील फुटण्याची शक्यता आहे. जे आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत त्यांचाही नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा गट फुटण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे. अवघ्या काही महिन्यांत मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडाचा फटका मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला बसू शकतो.


‘संकटकाळात पक्षाकडून साधी विचारपूस देखील केली गेली नाही’ भायखळा येथील शिवसेनेचे आमदार आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनी आपण शिंदे गटात सामील का झालो आहोत? किंवा हा निर्णय घेण्याची वेळ का आली? या बाबत व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे.


मधल्या काही महिन्यांत कुटुंबावर संकटे आली, मात्र या संकटकाळात पक्षाकडून साधी विचारपूस देखील केली गेली नाही. याबाबत मनात वाईट वाटलं, मी स्वत: मोठ्या आजाराने त्रस्त असतानाही पक्षाने विचारलं नाही, असे त्या म्हणाल्या. आम्ही अजून शिवसेनेतच असल्याचे यामिनी जाधव म्हणाल्या.

Comments
Add Comment

प्रसिद्ध मराठी कलाकार किशोर कदम यांचे मुंबईतलं घर धोक्यात! मुख्यमंत्र्यांना केले मदतीचे आवाहन, नेमकं प्रकरण काय?

कमिटी, पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने घोटाळा घडवल्याचा केला आरोप  मुंबई: कवी सौमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले

ओप्पोने के13 टर्बो सीरिजमध्ये दोन नवे गेमिंग स्मार्टफोन केले लॉन्च

मुंबई : ओप्पोने आपल्या गेमिंग केंद्रित के13 टर्बो मालिकेत दोन नवे स्मार्टफोन के13 टर्बो प्रो

अंगारकी संकष्टी चतुर्थीसाठी मेट्रोची सेवा वाढवली!

मुंबई : १२ ऑगस्ट रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी

खेकडे पकडायला गेले आणि बुडून मेले

कांदिवलीतील तलावात खेकडे पकडताना पिता-पुत्राचा बुडून मृत्यू मुंबई : कांदिवली पूर्व येथे एका तलावात खेकडे

राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी विभागातील सर्वांनी प्रयत्न करावेत : मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्यात मत्स्योत्पादन वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. यंदाच्या हंगामामध्ये राज्यात ४७ टक्के मत्स्योत्पादन

ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ : मुंबईत क्रिकेट स्टार्सचा मेळावा, ट्रॉफी टूरला जल्लोषात सुरुवात

मुंबई : मुंबईत आज ‘ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५’ च्या ‘५० दिवस बाकी’ कार्यक्रमाला क्रिकेट जगतातील दिग्गजांची