२६ जानेवारीपासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सेवांचा विस्तार; दररोजसाठी वाढणार इतक्या फेऱ्या

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. २६ जानेवारी २०२६ पासून पश्चिम रेल्वेवर वातानुकुलित लोकल ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार असून, दररोज १२ अतिरिक्त एसी लोकल सेवा सुरू केल्या जाणार आहेत. यामुळे उपनगरीय प्रवास अधिक आरामदायी आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.


सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दररोज १०९ एसी लोकल ट्रेन धावतात, तर शनिवार आणि रविवारी ६५ एसी लोकल चालवल्या जातात. नव्या निर्णयानंतर आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशी एसी लोकलची एकूण संख्या १२१ इतकी होणार असून, शनिवार आणि रविवारी ही संख्या वाढून ७७ एसी लोकलपर्यंत पोहोचेल तर वाढीव १२ एसी लोकल सेवा २६ जानेवारीपासून नियमितपणे कार्यान्वित होतील.


मिळालेल्या माहितीनुसार, नव्या लोकलपैकी आठ एसी लोकल गर्दीच्या वेळेत धावणार आहेत. यामध्ये सकाळच्या वेळेत चार आणि संध्याकाळच्या वेळेत चार एसी लोकलचा समावेश असेल. त्यामुळे कार्यालयीन वेळेत होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, नव्या सेवांमुळे काही उपनगरीय लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात किरकोळ बदल होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


या वाढीमुळे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरील एसी लोकल सेवांची संख्या आणखी वाढणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरही लवकरच एसी लोकल सेवांचा विस्तार करण्यात येणार असून, यामुळे चाकरमान्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र