Nitesh Rane : 'हा' तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा!"- महायुतीच्या विजयानंतर नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपचे फायरब्रँड नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. या विजयाचे श्रेय त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीला दिले आहे.



मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर मोहोर


नितेश राणे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांचे विशेष कौतुक केले आहे. "राज्यातील महापालिका निवडणुकीत मिळालेले दणदणीत यश हे जनतेच्या प्रचंड विश्वासाचे प्रतीक आहे. विशेषतः मुंबई महापालिकेसह राज्यभरात महायुतीने जो विजय मिळवला आहे, त्यामागे मुख्यमंत्री महोदयांचे दूरदृष्टीपूर्ण आणि ठाम नेतृत्व महत्त्वाचे ठरले आहे," अशा शब्दांत राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाची पावती दिली.



मुंबईत परिवर्तनाचा नवा अध्याय


मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षांची सत्ता उलथवून महायुतीने बहुमताचा आकडा (११८ जागा) पार केला आहे. या विजयाचा उल्लेख करताना नितेश राणे म्हणाले की, हा विजय महाराष्ट्राच्या विकासाचा आणि प्रगतीचा नवा अध्याय ठरेल. महायुतीच्या या विजयामुळे मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांच्या विकासाला आता नवी गती मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ


केवळ नेतृत्वच नाही, तर तळागाळातील कार्यकर्त्यांचेही नितेश राणे यांनी आभार मानले आहेत. महायुतीतील प्रत्येक घटक पक्ष, पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळेच विरोधकांना धूळ चारणे शक्य झाले, असे त्यांनी नमूद केले. भेटीनंतर त्यांनी सोशल मीडियावर 'जय श्री राम' लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या.

Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य