Nitesh Rane : 'हा' तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा!"- महायुतीच्या विजयानंतर नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपचे फायरब्रँड नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. या विजयाचे श्रेय त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीला दिले आहे.



मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर मोहोर


नितेश राणे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांचे विशेष कौतुक केले आहे. "राज्यातील महापालिका निवडणुकीत मिळालेले दणदणीत यश हे जनतेच्या प्रचंड विश्वासाचे प्रतीक आहे. विशेषतः मुंबई महापालिकेसह राज्यभरात महायुतीने जो विजय मिळवला आहे, त्यामागे मुख्यमंत्री महोदयांचे दूरदृष्टीपूर्ण आणि ठाम नेतृत्व महत्त्वाचे ठरले आहे," अशा शब्दांत राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाची पावती दिली.



मुंबईत परिवर्तनाचा नवा अध्याय


मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षांची सत्ता उलथवून महायुतीने बहुमताचा आकडा (११८ जागा) पार केला आहे. या विजयाचा उल्लेख करताना नितेश राणे म्हणाले की, हा विजय महाराष्ट्राच्या विकासाचा आणि प्रगतीचा नवा अध्याय ठरेल. महायुतीच्या या विजयामुळे मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांच्या विकासाला आता नवी गती मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ


केवळ नेतृत्वच नाही, तर तळागाळातील कार्यकर्त्यांचेही नितेश राणे यांनी आभार मानले आहेत. महायुतीतील प्रत्येक घटक पक्ष, पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळेच विरोधकांना धूळ चारणे शक्य झाले, असे त्यांनी नमूद केले. भेटीनंतर त्यांनी सोशल मीडियावर 'जय श्री राम' लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या.

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर