भारताचा श्रीलंकेवर पाच विकेट्सने विजय

  101

नवी दिल्ली : दुसऱ्या टी-२० सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रीलंकेच्या संघाने २० षटकात सात विकेट्स गमावून भारतासमोर १२६ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पाच विकेट्स राखून हा सामना जिंकला.


तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा पाच विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारतीय संघान टी-२० मालिकेवर २-० ने कब्जा केला आहे. या मालिकेतील तिसरा सामना केवळ औपचारिकता म्हणून खेळला जाईल.


श्रीलंकेच्या संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताचे सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्माने संघाला चांगली सुरुवात करून दिली. भारताच्या डावातील पाचव्या षटकात शेफाली वर्मा बाद झाली. त्यानंतर एस मेघनाही स्वस्तात माघारी परतली.


या सामन्यात स्मृती मानधान मोठी धावसंख्या उभारेल, अशी अपेक्षा केली जात असताना तिच्या वयैक्तिक १७ धावांवर आऊट झाला. अखेर कर्णधार हरमनप्रीत सिंह (३१ धावा) संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने पाच विकेट्स राखून सामना जिंकला. श्रीलंकेकडून इनोका रणवीरा आणि ओ रणसिंगेनं यांनी प्रत्येकी दोन- दोन विकेट्स घेतल्या. तर, एस कुमारीला एक विकेट मिळाली.

Comments
Add Comment

IND vs ENG: आम्ही कधीच हार मानणार नाही', हेड कोच गौतम गंभीरची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam

DSP सिराजला पोलीस विभागाने केला या खास अंदाजात सलाम, मोठ्या कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे