१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि त्यातही धुवांधार फलंदाजी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची. कारण वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा इतिहास रचलाय. झिम्बाब्वेतील हररेमध्ये इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या अंतिम सामन्यात वैभवने फक्त ५५ चेंडूंमध्ये शानदार शतक झळकावले आहे.



शानदार शतकांची खेळी


१९ वर्षांखालील वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना वैभवने पराक्रम केला. त्याने केवळ ५५ चेंडूत ८ चौकार आणि ८ उत्तुंग सिक्सर मारत आपलं शतक पूर्ण केल आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता जो वैभवने सार्थ ठरवला आहे. शतक झळकावल्यानंतरही वैभवची आक्रमक खेळी सुरू राहिली. त्याने अवघ्या ८० चेंडूत १७५ धावा केल्या. यात १५ चौकार आणि १५ षटकारांचा समावेश होता. अवघ्या ३० चेंडूत वैभवने १५० धावा केल्या.



विक्रमी खेळी


शतकी खेळीसोबतच वैभव सूर्यवंशीने अनेकी दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडले आहेत. १९ वर्षांखालील वर्ल्ड कपच्या एकाच एडिशनमध्ये सर्वधिक षटकार मारण्याचा विक्रम आता वैभवच्या नावावर जमा झाला आहे. त्याने १६.१ ओव्हरमध्ये फिरकीपटू फरहान अहमदच्या चेंडूत लॉन्ग ऑफच्या वरून षटकार मारत डेवाल्ड ब्रेव्हिसचा विक्रम मोडीत काढला आहे. बेबी एबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या ब्रेव्हिसने २०२२ मध्ये ६ सामन्यात २० षटकार मारले होते, पण वैभवने त्यालाही मागे टाकले आहे.



विराट आणि शुभमन गिललाही टाकले मागे


वैभवने ऐतिहासिक खेळीदरम्यान भारतीय दिग्गज खेळाडूंनाही मागे टाकले आहे. चक्क विराट कोहली, शुभमन गिल यांचे विक्रम वैभवने मोडले आहेत. २००८ च्या वर्ल्ड कपमधील तन्मय श्रीवास्तवचा रेकॉर्ड मोडीत काढत तो यूथ वनडेमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज झाला आहे. फायनलपूर्वी वैभवला हा टप्पा गाठण्यासाठी ८० धावांची गरज होती, जी त्याने सहज पूर्ण केली. या स्पर्धेत त्याने यापूर्वीच विराट कोहली, शुभमन गिल, सरफराज खान आणि उन्मुक्त चंद यांसारख्या मोठ्या खेळाडूंच्या धावांचे विक्रम मागे टाकले आहेत.


भारताने सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानच्या ३११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करून विजय मिळवला होता, तर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला २७ धावांनी हरवून अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले होते. सध्या भारतीय संघ आपला १० व फायनल सामना खेळत आहे तर इंग्लंडचा संघ सहाव्यांदा अंतिम सामन्यात पोहोचला आहे. भारताने आतापर्यंत ५ वेळा हे विजेतेपद मिळवले आहे. तर सध्या इंग्लंड आपल्या १९९८ नंतर आपल्या दुसऱ्या ट्रॉफीची प्रतीक्षा करत आहेत.

Comments
Add Comment

P.V. Sindhu - Virat Kohli : पी. व्ही. सिंधूच्या कमबॅकमध्ये किंग कोहलीचा सिंहाचा वाटा; विराट कोहलीच्या 'त्या' एका सल्ल्याचा सिंधूवर असा झाला सकारात्मक परिणाम

- सिंधूची तब्बल दोन वर्षांनंतर मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी मुंबई : भारताची स्टार

Spain vs Argentina : अंतिम सामन्यांनंतर अर्जंटिनाला मोठा धक्का ! फिफाकडून खेळाडूंवर कारवाईची शक्यता; नेमकं प्रकरण काय ?

मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेनने १-० ने अर्जेंटिनाचा पराभव केला होता. अंतिम सामन्यांनंतर

FIFA WORLDCUP 2026 : स्पेनचा विश्वचषक विजेता संघ मायदेशी परतला; माद्रिदमध्ये २० लाख लोकांकडून ऐतिहासिक आणि शाही स्वागत

माद्रिद: न्यू जर्सी येथे पार पडलेल्या रोमांचक अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा १-० अशा गोलने पराभव करत विश्वचषक

Shubham Gill : कुलदीपला का डावलण्यात आलं? शुभमन गिलने दिली मोठी माहिती; निर्णय योगय होता की नाही ?

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत, इंग्लंडने २-१ ने भारतावर विजय मिळवला. या

Team India Zimbhave Tour : भारताचा युके दौरा संपला;आता झिम्बाब्वेविरुद्धचे पुढचे सामने कधी ?

मुंबई : इंग्लंड दौऱ्यात निराशाजनक कामगिरीनंतर भारतासमोर आता झिम्बाब्वेविरुद्ध पुनरागमन करण्याची संधी आहे.

PV Sindhu : चायना ओपनमध्ये पीव्ही सिंधूकडे भारताचे नेतृत्व; सात्विक आणि चिरागची दुखापतीमुळे माघार

नवी दिल्ली : जपान ओपन सुपर ७५० विजेतेपद जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेली भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही