१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि त्यातही धुवांधार फलंदाजी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची. कारण वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा इतिहास रचलाय. झिम्बाब्वेतील हररेमध्ये इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या अंतिम सामन्यात वैभवने फक्त ५५ चेंडूंमध्ये शानदार शतक झळकावले आहे.



शानदार शतकांची खेळी


१९ वर्षांखालील वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना वैभवने पराक्रम केला. त्याने केवळ ५५ चेंडूत ८ चौकार आणि ८ उत्तुंग सिक्सर मारत आपलं शतक पूर्ण केल आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता जो वैभवने सार्थ ठरवला आहे. शतक झळकावल्यानंतरही वैभवची आक्रमक खेळी सुरू राहिली. त्याने अवघ्या ८० चेंडूत १७५ धावा केल्या. यात १५ चौकार आणि १५ षटकारांचा समावेश होता. अवघ्या ३० चेंडूत वैभवने १५० धावा केल्या.



विक्रमी खेळी


शतकी खेळीसोबतच वैभव सूर्यवंशीने अनेकी दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडले आहेत. १९ वर्षांखालील वर्ल्ड कपच्या एकाच एडिशनमध्ये सर्वधिक षटकार मारण्याचा विक्रम आता वैभवच्या नावावर जमा झाला आहे. त्याने १६.१ ओव्हरमध्ये फिरकीपटू फरहान अहमदच्या चेंडूत लॉन्ग ऑफच्या वरून षटकार मारत डेवाल्ड ब्रेव्हिसचा विक्रम मोडीत काढला आहे. बेबी एबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या ब्रेव्हिसने २०२२ मध्ये ६ सामन्यात २० षटकार मारले होते, पण वैभवने त्यालाही मागे टाकले आहे.



विराट आणि शुभमन गिललाही टाकले मागे


वैभवने ऐतिहासिक खेळीदरम्यान भारतीय दिग्गज खेळाडूंनाही मागे टाकले आहे. चक्क विराट कोहली, शुभमन गिल यांचे विक्रम वैभवने मोडले आहेत. २००८ च्या वर्ल्ड कपमधील तन्मय श्रीवास्तवचा रेकॉर्ड मोडीत काढत तो यूथ वनडेमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज झाला आहे. फायनलपूर्वी वैभवला हा टप्पा गाठण्यासाठी ८० धावांची गरज होती, जी त्याने सहज पूर्ण केली. या स्पर्धेत त्याने यापूर्वीच विराट कोहली, शुभमन गिल, सरफराज खान आणि उन्मुक्त चंद यांसारख्या मोठ्या खेळाडूंच्या धावांचे विक्रम मागे टाकले आहेत.


भारताने सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानच्या ३११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करून विजय मिळवला होता, तर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला २७ धावांनी हरवून अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले होते. सध्या भारतीय संघ आपला १० व फायनल सामना खेळत आहे तर इंग्लंडचा संघ सहाव्यांदा अंतिम सामन्यात पोहोचला आहे. भारताने आतापर्यंत ५ वेळा हे विजेतेपद मिळवले आहे. तर सध्या इंग्लंड आपल्या १९९८ नंतर आपल्या दुसऱ्या ट्रॉफीची प्रतीक्षा करत आहेत.

Comments
Add Comment

FIFA World Cup 2026 : मेस्सी गोलमध्ये अव्वल, पण पॉवर रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर! 'हा' जर्मन स्टार अव्वल

फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेने आता बाद फेरीत प्रवेश केला असून प्रत्येक सामना निर्णायक ठरत आहे. अशातच फिफाने

FIFA World Cup 2026 : जर्मनीला मोठा धक्का! पॅराग्वेने पेनल्टी शूटआऊटमध्ये केला पराभव; विश्वचषकातून धक्कादायक एक्झिट

फिफा विश्वचषक २०२६ मध्ये सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. चार वेळचा विश्वविजेता जर्मनीला पॅराग्वेने पेनल्टी

T20 Cricket : एलए ऑलिम्पिकसाठी क्रिकेटच्या पात्रता निकषांना आयओसीची मंजुरी

नवी दिल्ली : लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ साठी क्रिकेटच्या पात्रता प्रणालीला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाकडून पराभवानंतर भारताचं टी-20 वर्ल्डकपमधील आव्हान संपलं; 'या' चुका ठरल्या निर्णायक

आयसीसी (ICC) महिला टी-20 (T20) वर्ल्डकपमध्ये (World Cup) ऑस्ट्रेलियाने (Australia) भारताचा ६ विकेट्सनी पराभव करत स्पर्धेतील भारताचं

IND vs IRE T20I : आयर्लंडविरुद्ध भारताचा टी-20 मालिकेत धक्कादायक पराभव; कुठे चुकली टीम इंडिया?

IND vs IRE T20I : भारताचा टी-20 (T20) कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचा पहिलाच परदेश दौरा निराशाजनक ठरला. बेलफास्टमध्ये झालेल्या

IND vs IRE T20I : भारताला मोठा धक्का! आयर्लंडने T20I मालिका २-० ने जिंकली

IND vs IRE T20I : भारताला आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय (T20I) सामन्यात अवघ्या एका धावेने पराभव (Defeat)