राज्यात ४२०५ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान, एकूण २५३१७ ॲक्टिव्ह रुग्ण

  103

मुंबई (हिं.स.) : राज्यात आज ४२०५ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले. तर तीन कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. आज रोजी एकूण २५३१७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


आज ३७५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,८१,२३२ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८२% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१७,९३,८७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,५४,४४५ (०९.७२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.


राज्यात बी ए.५ व्हेरीयंटचा आणखी एक रुग्ण


• भारतीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, (नीरी) नागपूर यांच्या ताज्या अहवालानुसार नागपूर येथे बीए.५ व्हेरीयंटचा १ रुग्ण आढळला आहे.


• ही २७ वर्षांची महिला असून तिचे संपूर्ण लसीकरण झालेले आहे. १९ जून रोजी कोविड बाधित आलेल्या या रुग्णाला सुरुवातीला सौम्य लक्षणे होती. सध्या ती घरगुती विलगिकरणात असून पूर्णपणे लक्षणे विरहित असून तिची प्रकृती स्थिर आहे.


• यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या २६ झाली आहे. या पैकी पुण्यात १५, मुंबईत ५, नागपूर येथे ४ तर ठाण्यात २ आढळले आहेत.

Comments
Add Comment

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी