साताऱ्यात वारकऱ्यांच्या वाहनाला अपघात, एकाचा मृत्यू, ३० जण जखमी

सातारा (हिं.स.) : कोल्हापूर येथून आळंदीस निघालेल्या वारकऱ्यांच्या वाहनाचा शिरवळ येथे रविवारी पहाटेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एक वारकरी ठार झाला असून सुमारे ३० जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात मायाप्पा कोंडीबा माने (४५, रा. भादोले, जि. कोल्हापूर) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच मारुती भैरुनाथ कोळी (४०, रा. लाहोटे, जि. कोल्हापूर) हे मृत्यूशी झुंज देत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, सातारा-पुणे महामार्गावर शिरवळ (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील पुणे थांब्याजवळ आयशर टेम्पो आणि ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने असलेल्या आयशर टेम्पोने कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले येथील दिंडी सोहळ्यातील ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेमध्ये एक वारकरी ठार तर ३० वारकरी जखमी झाले आहेत. दुर्घटनेत ११ वारकरी किरकोळ जखमी झाले आहे. रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.


असा झाला अपघात


अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले, लाहोटे येथील ह.भ.प. वासकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली असणाऱ्या भद्रेश्वर भाविक मंडळाची दिंडी क्र. १ व ७ हा दिंडी सोहळा पंढरपूर पायी वारी करणेकरीता आळंदी ते पंढरपूर असा पायी दिंडी सोहळ्याकरीता आळंदी येथे ट्रॅक्टर (एमएच १० एवाय ५७०५) ट्रॉलीमधून प्रवास करीत होते. यावेळी सदरील ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडलेल्या होत्या. यामध्ये महिलांसह ४३ वारकरी आळंदीकरीता प्रवास करीत होते.


दरम्यान, ट्रॅक्टर ट्रॉली सातारा ते पुणे जाणाऱ्या महामार्गावर खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावच्या हद्दीत आली असता पाठीमागून भाजी घेऊन पुण्याकडे भरधाव वेगात निघालेल्या आयशर टेम्पो (एमएच ४५ एएफ २२७७) वरील चालकाचे नियंत्रण सुटून महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या विद्युत खांबाला जोरदार धडक दिली. तसेच महामार्गावरून दिंडी सोहळ्याकरीता निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली.



ही धडक इतकी जोरदार होती की, धडकेनंतर टेम्पो महामार्गावर जोरदार पलटी होत ट्रॉलीमधील वारकरी महामार्गावर हवेत उडत गंभीर जखमी झाले तर ट्रॉलीचा अक्षरशः चक्काचूर झाला. यावेळी ट्रॉलीमधील लोखंडी बार मायाप्पा माने व मारुती कोळी यांच्या पोटामध्ये घुसल्याने ते गंभीर जखमी झाले.

Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे