पोलीस अधीक्षकांच्या जाचाला कंटाळून जमादाराची आत्महत्या

  96

यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत पोलिस जमादाराने गळफास लावून आत्महत्या केली. विष्णू कोरडे (वय ५४) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून पोलिस अधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.


पुसद येथील रहिवाशी असलेले कोरडे हे महागावला कार्यरत असताना लाचलुचपत प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले होते. चौकशीदरम्यान त्यांची बदली यवतमाळ पोलिस मुख्यालयात करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यावर बिटरगाव पोलिस ठाण्यात त्यांची बदली करण्यात आली. येथे कार्यरत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाल्याने काही दिवस रुग्णालयात होते.


उपचारासाठी बराच खर्च झाल्याने आर्थिक अडचणीत होते. वाढते वय आणि दुखापतीमुळे त्यांनी पुसदला बदली देण्याची विनंती पोलिस अधीक्षकांकडे केली. वैद्यकीय खर्चाचे बिलही मंजूर झाले नाही. पोलिस अधीक्षकांना विनंती करण्यासाठी पत्नीसह गेले असता अपमान करण्यात आला. आपल्या मृत्यूस पोलिस अधीक्षकच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी चिठ्ठीत केला आहे.


याबाबत पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी कोरडे यांच्यावरील कार्यवाही तत्कालीन पोलिस अधीक्षकांच्या काळातील असल्याचे सांगितले. मृत्यूपूर्व चिठ्ठीतील हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविण्यात येईल. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या