पोलीस अधीक्षकांच्या जाचाला कंटाळून जमादाराची आत्महत्या

यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत पोलिस जमादाराने गळफास लावून आत्महत्या केली. विष्णू कोरडे (वय ५४) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून पोलिस अधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.


पुसद येथील रहिवाशी असलेले कोरडे हे महागावला कार्यरत असताना लाचलुचपत प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले होते. चौकशीदरम्यान त्यांची बदली यवतमाळ पोलिस मुख्यालयात करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यावर बिटरगाव पोलिस ठाण्यात त्यांची बदली करण्यात आली. येथे कार्यरत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाल्याने काही दिवस रुग्णालयात होते.


उपचारासाठी बराच खर्च झाल्याने आर्थिक अडचणीत होते. वाढते वय आणि दुखापतीमुळे त्यांनी पुसदला बदली देण्याची विनंती पोलिस अधीक्षकांकडे केली. वैद्यकीय खर्चाचे बिलही मंजूर झाले नाही. पोलिस अधीक्षकांना विनंती करण्यासाठी पत्नीसह गेले असता अपमान करण्यात आला. आपल्या मृत्यूस पोलिस अधीक्षकच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी चिठ्ठीत केला आहे.


याबाबत पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी कोरडे यांच्यावरील कार्यवाही तत्कालीन पोलिस अधीक्षकांच्या काळातील असल्याचे सांगितले. मृत्यूपूर्व चिठ्ठीतील हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविण्यात येईल. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद