पोलीस अधीक्षकांच्या जाचाला कंटाळून जमादाराची आत्महत्या

यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत पोलिस जमादाराने गळफास लावून आत्महत्या केली. विष्णू कोरडे (वय ५४) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून पोलिस अधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.


पुसद येथील रहिवाशी असलेले कोरडे हे महागावला कार्यरत असताना लाचलुचपत प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले होते. चौकशीदरम्यान त्यांची बदली यवतमाळ पोलिस मुख्यालयात करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यावर बिटरगाव पोलिस ठाण्यात त्यांची बदली करण्यात आली. येथे कार्यरत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाल्याने काही दिवस रुग्णालयात होते.


उपचारासाठी बराच खर्च झाल्याने आर्थिक अडचणीत होते. वाढते वय आणि दुखापतीमुळे त्यांनी पुसदला बदली देण्याची विनंती पोलिस अधीक्षकांकडे केली. वैद्यकीय खर्चाचे बिलही मंजूर झाले नाही. पोलिस अधीक्षकांना विनंती करण्यासाठी पत्नीसह गेले असता अपमान करण्यात आला. आपल्या मृत्यूस पोलिस अधीक्षकच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी चिठ्ठीत केला आहे.


याबाबत पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी कोरडे यांच्यावरील कार्यवाही तत्कालीन पोलिस अधीक्षकांच्या काळातील असल्याचे सांगितले. मृत्यूपूर्व चिठ्ठीतील हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविण्यात येईल. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये