टी२० विश्वचषक स्पर्धेची खरी तयारी इंग्लंड दौऱ्यापासून

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी२० विश्वचषक स्पर्धेची खरी तयारी इंग्लंड दौऱ्यापासून असल्याचे मत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केले. दक्षिण आफ्रिकेसोबतची मायदेशातील मालिका आणि आयर्लंड दौरा हा केवळ प्रयोग असल्याचे गांगुली म्हणाले. प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत गांगुली बोलत होते.


गांगुली म्हणाले की, इंग्लंड दौऱ्यासाठी विश्वचषकातील संभाव्य खेळाडूंचाच संघात समावेश करण्यात येणार आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवडकर्ते इंग्लंड दौऱ्यासाठी संघातील टी२० विश्वचषकासाठी संभाव्य खेळाडूंची निवड करतील. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच टी-२० सामन्यांच्या घरच्या मालिकेसाठी निवड, त्यानंतर आयर्लंडचा दौरा हा राहुल द्रविड आणि त्याच्या संघाने डोळ्यासमोर ठेवून प्रयोग केले आहेत. या मालिकेत युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून त्यांना संधी दिली जात आहे.


दक्षिण आफ्रिकेसोबतच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी के.एल राहुल आणि कुलदीप यादव दुखापतींमुळे मालिकेतून बाहेर पडले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ऋषभ पंत कर्णधार आहे. त्याचबरोबर आयर्लंड दौऱ्यावर होणाऱ्या २ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी हार्दिक पंड्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत