Categories: ठाणे

महावितरणच्या धाडीत तीन महिन्यात १०६ चोरीच्या केसेस

Share

मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाड ग्रामीण भागात काही ठिकाणी राजरोसपणे विद्युत तारांवर आकडे टाकून चोरीची लाईट वापरली जाते. याची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मुरबाड उपविभाग अंतर्गत एप्रिल, मे, जून२०२२ या तीन महिन्यांमध्ये मुरबाड तालुक्यात अंतर्गत एकूण १०६ ग्राहकांना वीज चोरी करताना पकडले असून पकडलेल्या वीज चोरी मध्ये ७५८०१ युनिट महावितरण कंपनीस प्राप्त झाले असून त्या मोबदल्यात १२लाख ३३हजार४८०/एवढी रक्कम महावितरण कंपनीला प्राप्त होणार आहे.

त्यामुळे वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली व चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच या तीन महिन्याच्या कालावधीत प्रामुख्याने चार गाव पुढील प्रमाणे कलमखांडे, खाटेघर, शिवले, माल्हेड या गावासह १०६ ग्राहकांवर चोरीच्या केसेस करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून १२लाख ३३हजार ४८०/ रुपये जमा करण्यात येणार आहे.

तसेच वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांनी वीज चोरीच्या बिलाचा भरणा केल्यास त्यांच्यावर विद्युत कायदा २००३ कलम १३५ अंतर्गत पोलीस स्टेशन मध्ये वीज चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मुरबाड महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता विवेक सिंगलवार यांनी दिली आहे.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

5 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

5 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

6 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

7 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

8 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

8 hours ago