महावितरणच्या धाडीत तीन महिन्यात १०६ चोरीच्या केसेस

  157

मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाड ग्रामीण भागात काही ठिकाणी राजरोसपणे विद्युत तारांवर आकडे टाकून चोरीची लाईट वापरली जाते. याची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मुरबाड उपविभाग अंतर्गत एप्रिल, मे, जून२०२२ या तीन महिन्यांमध्ये मुरबाड तालुक्यात अंतर्गत एकूण १०६ ग्राहकांना वीज चोरी करताना पकडले असून पकडलेल्या वीज चोरी मध्ये ७५८०१ युनिट महावितरण कंपनीस प्राप्त झाले असून त्या मोबदल्यात १२लाख ३३हजार४८०/एवढी रक्कम महावितरण कंपनीला प्राप्त होणार आहे.


त्यामुळे वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली व चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच या तीन महिन्याच्या कालावधीत प्रामुख्याने चार गाव पुढील प्रमाणे कलमखांडे, खाटेघर, शिवले, माल्हेड या गावासह १०६ ग्राहकांवर चोरीच्या केसेस करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून १२लाख ३३हजार ४८०/ रुपये जमा करण्यात येणार आहे.


तसेच वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांनी वीज चोरीच्या बिलाचा भरणा केल्यास त्यांच्यावर विद्युत कायदा २००३ कलम १३५ अंतर्गत पोलीस स्टेशन मध्ये वीज चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मुरबाड महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता विवेक सिंगलवार यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या