महाराजांचा पुतळा योग्य ठिकाणी बसविण्यासाठी किती वेळ घेणार?

  65

कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा आम्हाला कोणी मोठे नाही. त्यांचा पुतळा योग्य ठिकाणी बसविण्यासाठी किती वेळ घेणार? महाराजांचा अपमान होईपर्यंत आम्ही हात बांधून गप्प बसणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.


जर आम्ही रातोरात छत्रपती शिवरायांचा पुतळा हलवला आणि योग्य जागी बसवला, तर आमच्यावर गुन्हे दाखल करायचे नाहीत, असा इशारादेखील आ. राणे यांनी दिला. कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, छत्रपती शिवरायांचा पुतळा नियोजित जागी स्थलांतरित करावा, यासाठी शहर भाजपच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणाला भाजप आमदार नितेश राणे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी आ. राणे यांनी प्रशासन आणि सरकारला व पालकमंत्री सामंत यांना चांगलेच धारेवर धरले.


ते म्हणाले, पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवलीतील सर्व्हीस रोडवरील पुतळा स्थलांतरित करण्यासंदर्भात कणकवलीकरांना शब्द दिला होता. पण अद्याप पुतळा स्थलांतर झाला नसल्याने उपोषणाचा पर्याय निवडला. हे औरंगजेबला मानणारे राज्य सरकार आहे. त्यांच्या राज्यात छत्रपती शिवरायांचा सन्मान होईल, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. मात्र आम्ही आमच्या आराध्यदैवताचा अपमान होऊ देणार नाही.


छत्रपतींसमोर आमच्या पदाची आम्हाला चिंता नाही. पुतळा स्थलांतरित करण्याच्या मुद्द्यावरून जर जिल्ह्यात तांडव निर्माण झाले, तर आमची त्याला तयारी आहे. असा इशारादेखील आ. राणे यांनी दिला. भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे व त्याच्या सहकाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे, प्राची कर्पे, प्रज्ञा ढवण, सुशील सावंत, मेघा गांगण, राजश्री धुमाळे, साक्षी वाळके, आदी उपस्थित होते. यावेळी पुतळ्याच्या प्रस्तावित जागेची देखील आ. राणे यांनी पाहणी केली.

Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी