कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा आम्हाला कोणी मोठे नाही. त्यांचा पुतळा योग्य ठिकाणी बसविण्यासाठी किती वेळ घेणार? महाराजांचा अपमान होईपर्यंत आम्ही हात बांधून गप्प बसणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
जर आम्ही रातोरात छत्रपती शिवरायांचा पुतळा हलवला आणि योग्य जागी बसवला, तर आमच्यावर गुन्हे दाखल करायचे नाहीत, असा इशारादेखील आ. राणे यांनी दिला. कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, छत्रपती शिवरायांचा पुतळा नियोजित जागी स्थलांतरित करावा, यासाठी शहर भाजपच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणाला भाजप आमदार नितेश राणे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी आ. राणे यांनी प्रशासन आणि सरकारला व पालकमंत्री सामंत यांना चांगलेच धारेवर धरले.
ते म्हणाले, पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवलीतील सर्व्हीस रोडवरील पुतळा स्थलांतरित करण्यासंदर्भात कणकवलीकरांना शब्द दिला होता. पण अद्याप पुतळा स्थलांतर झाला नसल्याने उपोषणाचा पर्याय निवडला. हे औरंगजेबला मानणारे राज्य सरकार आहे. त्यांच्या राज्यात छत्रपती शिवरायांचा सन्मान होईल, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. मात्र आम्ही आमच्या आराध्यदैवताचा अपमान होऊ देणार नाही.
छत्रपतींसमोर आमच्या पदाची आम्हाला चिंता नाही. पुतळा स्थलांतरित करण्याच्या मुद्द्यावरून जर जिल्ह्यात तांडव निर्माण झाले, तर आमची त्याला तयारी आहे. असा इशारादेखील आ. राणे यांनी दिला. भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे व त्याच्या सहकाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे, प्राची कर्पे, प्रज्ञा ढवण, सुशील सावंत, मेघा गांगण, राजश्री धुमाळे, साक्षी वाळके, आदी उपस्थित होते. यावेळी पुतळ्याच्या प्रस्तावित जागेची देखील आ. राणे यांनी पाहणी केली.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…