महाराजांचा पुतळा योग्य ठिकाणी बसविण्यासाठी किती वेळ घेणार?

  67

कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा आम्हाला कोणी मोठे नाही. त्यांचा पुतळा योग्य ठिकाणी बसविण्यासाठी किती वेळ घेणार? महाराजांचा अपमान होईपर्यंत आम्ही हात बांधून गप्प बसणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.


जर आम्ही रातोरात छत्रपती शिवरायांचा पुतळा हलवला आणि योग्य जागी बसवला, तर आमच्यावर गुन्हे दाखल करायचे नाहीत, असा इशारादेखील आ. राणे यांनी दिला. कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, छत्रपती शिवरायांचा पुतळा नियोजित जागी स्थलांतरित करावा, यासाठी शहर भाजपच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणाला भाजप आमदार नितेश राणे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी आ. राणे यांनी प्रशासन आणि सरकारला व पालकमंत्री सामंत यांना चांगलेच धारेवर धरले.


ते म्हणाले, पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवलीतील सर्व्हीस रोडवरील पुतळा स्थलांतरित करण्यासंदर्भात कणकवलीकरांना शब्द दिला होता. पण अद्याप पुतळा स्थलांतर झाला नसल्याने उपोषणाचा पर्याय निवडला. हे औरंगजेबला मानणारे राज्य सरकार आहे. त्यांच्या राज्यात छत्रपती शिवरायांचा सन्मान होईल, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. मात्र आम्ही आमच्या आराध्यदैवताचा अपमान होऊ देणार नाही.


छत्रपतींसमोर आमच्या पदाची आम्हाला चिंता नाही. पुतळा स्थलांतरित करण्याच्या मुद्द्यावरून जर जिल्ह्यात तांडव निर्माण झाले, तर आमची त्याला तयारी आहे. असा इशारादेखील आ. राणे यांनी दिला. भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे व त्याच्या सहकाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे, प्राची कर्पे, प्रज्ञा ढवण, सुशील सावंत, मेघा गांगण, राजश्री धुमाळे, साक्षी वाळके, आदी उपस्थित होते. यावेळी पुतळ्याच्या प्रस्तावित जागेची देखील आ. राणे यांनी पाहणी केली.

Comments
Add Comment

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून