रिक्षातून शाळकरी मुलांच्या वाहतुकीला बंदी

  106

सोलापूर (हिं.स.) : शहरात पाचशेहून अधिक शाळा व महाविद्यालये आहेत. स्कूल बस परवडत नसल्याने अनेक पालक त्यांच्या मुलांना रिक्षातून शाळेत पाठवतात. रिक्षातून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे रिक्षा चालकांनी शाळकरी मुलांची वाहतूक करू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई किंवा रिक्षा जप्त होईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दिला आहे.


शहरातील नामांकित शाळांचे शैक्षणिक शुल्क परवडत नाहीत, तसेच स्कूल बसचे भाडेही परवडत नाही. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील पालकांची मुले दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतात. परवडेल अशा दरात त्यांच्या परिसरातील रिक्षांतून आपल्या मुलांना शाळेत पाठवितात.


पण, रिक्षांमध्ये सुरक्षिततेच्या अनुषंगाने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नसतात. तर दुसरीकडे, एकाच रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट-तिप्पट मुलांची वाहतूक केली जाते. त्यामुळे आता रिक्षांतून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक होऊ नये याकडे आरटीओचे विशेष लक्ष असणार आहे. तसेच शाळांनाही त्याबाबत आता खबरदारी घ्यावी लागणार आहे.

Comments
Add Comment

पंचवटीसह द्वारका परिसरात सलग पाचव्या दिवशी पाणीटंचाई

नागरिक त्रस्त : निलगिरी बाग केंद्रावर तांत्रिक बिघाड जैसे थे नाशिक : निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला

रुग्णालयातील स्वच्छतेवर चक्क नऊ कोटी खर्च; मनपाचा वैद्यकीय विभाग ठेकेदारांवर मेहेरबान?

नाशिक : महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील पाच रुग्णालयांमध्ये साफसफाईच्या कामांसाठी तब्बल नऊ कोटींचा खर्च

वीज ग्राहकांना सरसकट दिलासा; घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक वीजदरात कपात

मुंबई/नाशिक : राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीजदर ठरविण्यासाठी महावितरणने दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र

मनमाडकरांना लवकरच मिळणार रोज पाणी

करंजवण योजना पूर्ण; आ. कांदे यांच्याकडून पाहणी मनमाड : चार दशकांपासून पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या

ना. भुजबळांच्या आदेशाला ठेकेदारांची ‘मातीची टोपली’

पिंपळस - येवला रस्त्यावरील खड्ड्यांत माती; अपघातांचा वाढला धोका निफाड : पिंपळस ते येवला रस्त्यावर सध्या

पिंपरी महापालिकेत डी आर सी घोटाळा उघड

पिंपरी : महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातील उपअभियंता दिनेश फाटक आणि कनिष्ठ अभियंता संभाजी गायकवाड यांनी