रिक्षातून शाळकरी मुलांच्या वाहतुकीला बंदी

  110

सोलापूर (हिं.स.) : शहरात पाचशेहून अधिक शाळा व महाविद्यालये आहेत. स्कूल बस परवडत नसल्याने अनेक पालक त्यांच्या मुलांना रिक्षातून शाळेत पाठवतात. रिक्षातून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे रिक्षा चालकांनी शाळकरी मुलांची वाहतूक करू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई किंवा रिक्षा जप्त होईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दिला आहे.


शहरातील नामांकित शाळांचे शैक्षणिक शुल्क परवडत नाहीत, तसेच स्कूल बसचे भाडेही परवडत नाही. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील पालकांची मुले दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतात. परवडेल अशा दरात त्यांच्या परिसरातील रिक्षांतून आपल्या मुलांना शाळेत पाठवितात.


पण, रिक्षांमध्ये सुरक्षिततेच्या अनुषंगाने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नसतात. तर दुसरीकडे, एकाच रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट-तिप्पट मुलांची वाहतूक केली जाते. त्यामुळे आता रिक्षांतून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक होऊ नये याकडे आरटीओचे विशेष लक्ष असणार आहे. तसेच शाळांनाही त्याबाबत आता खबरदारी घ्यावी लागणार आहे.

Comments
Add Comment

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त

समृद्धीवर वेगमर्यादेचे उल्लंघन, आता असणार सीसीटीव्हीची नजर

अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर एका मोपेडला ईर्टीका कारने जोरदार धडक

Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; विरोध करणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत