सरकार ओबीसींच्या मुद्यावर टाईमपास करत आहे - बावनकुळे

नागपूर : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळवून देण्यासाठी इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम राज्य सरकारने नेमलेल्या आयोगा मार्फत सुरू झाले आहे. मात्र, अत्यंत चुकीच्या पद्धतीने डेटा गोळा केला जात असल्याने ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होईल, अशी भूमिका राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील डेटा गोळा करण्याची पद्धत सदोष असल्याचे मान्य केले आहे.


यावर आज भाजपाचे ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी सुरुवातीलाच सांगितले होते की राज्य सरकार ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर टाईमपास करत आहे. हे सरकार अनेकदा याच मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयात तोंडघशी पडलेले असताना देखील सदोष पद्धतीने ओबीसींचा डेटा गोळा केला जातो आहे, तर मग सरकारचे मंत्री झोपा काढत आहेत का? असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.


एकीकडे आयोग चुकत असताना दुसरीकडे राज्याचा दौरा करून काय साध्य होणार आहे? असा प्रश्न देखील बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. एका आडनावाचे अनेक समाजात लोक असतात मग आडनावाच्या आधारे ओबीसींचा सदोष डेटा गोळा करून सरकार ओबीसी समाजाचे नुकसानच करू पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आयोगाची अशीच कार्यपद्धती राहिल्यास हे सरकार पुन्हा तोंडघशी पडेल, असे देखील बावनकुळे म्हणाले.


विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाचा डेटा गोळा करण्याची पद्धत सदोष असल्याची चूक लक्षात आणून दिल्यानंतर राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांनीदेखील डाटा गोळा करण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्याची गरज असल्याचे मान्य केले. त्यामुळे आता या मंत्र्यांनी इतर कामे बाजूला सारून पुढील आठ दिवसांत डेटा कसा गोळा होईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे बावनकुळे म्हणाले आहेत.

Comments
Add Comment

थंडी संपताच महाराष्ट्रात जाणवू लागलाय उन्हाचा तडाखा

मुंबई : थंडी सरत आली आहे. आणि हवामानात बदल जाणवायला लागला आहे. मार्च मधल्या आल्हाददायक वातावरणात उकाडा जाणवायला

CH. SAMBHAJINAGAR : MGM Hospital परिसरात नायजेरियन तरुणांकडून महिलेची छेडछाड आणि मारहाण

छत्रपती संभाजीनगर: शहरातील MGM Hospital परिसरात एका महिलेची छेडछाड व मारहाण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या

Malegaon Namaz Pathan : मालेगाव मनपा कार्यालयात नमाज पठण, सात जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नमाज पडल्याप्रकरणी सात जणांवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस