मलेरियाच्या वाढत्या रूग्ण संख्येने मुंबईकर चिंताग्रस्त

  81

मुंबई : पावसाळा सुरू होण्यापूर्वीच जूनच्या पहिल्या पाच दिवसांत मुंबईत मलेरियाचे ५७ रुग्ण आढळले आहेत. यातील बहुतांश प्रकरणे जी दक्षिण (एल्फिन्स्टन) आणि ई (भायखळा) वॉर्डातून येत आहेत. शहरात शनिवारी पावसाळा सुरू झाल्यानंतर डासांपासून पसरणाऱ्या आजारांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने, मुंबई महापालिकेने लोकांना स्वतःहून औषधे घेणे टाळण्याचे निर्देश दिले आहेत. मलेरियाचे रुग्ण वाढत असल्याने डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी सर्व खबरदारी घ्यावी, असे महापालिकेने आवाहन केले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला जारी करण्यात आलेल्या महापालिका अॅडव्हायझरीमध्ये बेड नेट आणि विंडो शीट वापरण्यास सांगण्यात आले आहे.


यावर्षी ५ जूनपर्यंत मुंबईत मलेरियाचे ९५० तर डेंग्यूचे ९४ रुग्ण आढळले आहेत. या संदर्भात मृत्यूची कोणतीही माहिती समोर आली नाही. महापालिकेच्या प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की, प्रकरणे रहिवासी क्षेत्रातून आणि बांधकाम साइट्स दोन्हीमधून येत आहेत. मलेरिया आणि कोव्हिड -१९ ची लक्षणे सारखीच असल्याने, डॉक्टरांनी रुग्णांना ताप, डोकेदुखी, पुरळ, स्नायू आणि सांधेदुखी, उलट्या आणि जुलाबाची तक्रार असल्यास उपचारात विलंब टाळण्याचा इशारा दिला आहे.


महापालिकेच्या कार्यवाहक आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या, ‘आम्ही रोगाचा स्त्रोत शोधण्यासाठी सर्व मलेरिया प्रकरणांची वैयक्तिकरित्या तपासणी करत आहोत. कोविड-१९ च्या भीतीमुळे अनेक लोक ताप आणि अंगदुखी यासारख्या लक्षणांसह हॉस्पिटलमध्ये धाव घेत आहेत, ज्यामुळे वेळेवर निदान आणि उपचार होण्यास मदत होते.’ मलेरियाशिवाय मुंबईत जूनपूर्वी डेंग्यूचे १० रुग्ण आढळले होते. पाच दिवसांत. याच कालावधीत, ई, एच पश्चिम (खार) आणि एच पूर्व (वांद्रे) वॉर्डांमध्ये वेक्टर-जनित गॅस्ट्रोची ७८ प्रकरणे नोंदवली गेली.


दरवर्षी पावसाळ्यात मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत मलेरिया, ताप, हिवताप, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदी साथींच्या आजारांचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहे. अन्य शहरांच्या तुलनेत मुंबई व नवी मुंबईत साथीच्या आजाराचे रुग्ण अधिक असतात. आजही मुंबईच्या महापालिका दवाखाने व रुग्णालयाहून मलेरियाचे अधिक रुग्ण खासगी दवाखाने व रुग्णालयात पहावयास मिळत आहेत. मलेरिया व डेंग्यूच्या रुग्णांच्या माहिती व आकडेवारीबाबत खासगी आरोग्य आस्थापणांकडून महापालिका प्रशासनाला कळविले जात नसल्याने महापालिका प्रशासनाला साथीच्या आजारांबाबत निश्चित आकडेवारी उपलब्ध होत नाही.

Comments
Add Comment

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यातून सुटका

मुसळधार पावसामुळे चौपाट्यांवर पसरलेला कचरा साफ मागील नऊ दिवसांमध्ये ९५० मेट्रीक टन कचऱ्याची लावली

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.