मुंबई : कोल्हापूरच्या पैलवानाने असा डाव टाकला की कळालाच नाही अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, ते आमचा गुडग्यात आहे म्हणत होते, पण आता ते गुडघ्यावर बसले आहेत, कसा विजय मिळवला हे त्यांना अजूनही कळालेले नाही. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेही कौतुक केले. शरद पवार यांनीही देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. देवेंद्रजी प्रेमळ आहेत, त्यांनी एक विश्वास तयार केल्याचे ते म्हणाले.
राज्यसभेप्रमाणेच आम्हाला विधान परिषदेसाठीही मतदान होईल. अनेकजण गुप्तपणे फडणवीस यांना हात धरून सांगत होते. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीमध्येही आम्ही जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला विधान परिषदेसाठी प्रस्ताव दिला. अर्ज माघारीसाठी दोन दिवस उरले आहेत, शहाणे आणि समजूतदार असाल तर आताच अर्ज मागे घ्या आणि निवडणूक बिनविरोध करा, अन्यथा आम्ही लढणारच आहोत आणि जिंकणारही आहोत, असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी दिला.
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…