रवी शास्त्रींच्या संघातून कार्तिकला ‘डच्चू’

  83

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ सामन्यांची टी-२० मालिका ९ जूनपासून सुरू होत आहे. पहिला टी-२० सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या टी-२० मालिकेसाठी अनेक भारतीय दिग्गजांना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेसाठी भारतीय निवड समितीने १८ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.


रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पहिल्या टी-२० सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. रवी शास्त्री यांनी निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये केएल राहुल आणि ऋतुराज गायकवाड यांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. ईशानला सलामीवीर म्हणून ब्रेक द्यावा किंवा त्याने तिसऱ्या क्रमांकावर प्रयत्न करू शकतो. चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर, पाचव्या क्रमांकावर ऋषभ पंत आणि त्यानंतर हार्दिक पांड्या फलंदाजीला यांची निवड केली आहे.


फिरकी गोलंदाजीसाठी अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल यांची निवड केली आहे. दुसरीकडे, रवी शास्त्रीने वेगवान गोलंदाजीसाठी भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. अर्शदीप किंवा उमरानला या दोघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवू शकता. भारतीय संघाला या वर्षी आशिया कप आणि टी-२० विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहे. अशा परिस्थितीत युवा खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी करून निवडकर्त्यांच्या नजरेत येण्याची चांगली संधी आहे.


रवी शास्त्री प्लेइंग इलेव्हन केएल राहुल, रुतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह/उमरान मलिक, हर्षल पटेल.

Comments
Add Comment

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे

ICC Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतून रोहित-विराटची नावे गायब

दुबई : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची नावे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतून गायब