रवी शास्त्रींच्या संघातून कार्तिकला ‘डच्चू’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ सामन्यांची टी-२० मालिका ९ जूनपासून सुरू होत आहे. पहिला टी-२० सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या टी-२० मालिकेसाठी अनेक भारतीय दिग्गजांना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेसाठी भारतीय निवड समितीने १८ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.


रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पहिल्या टी-२० सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. रवी शास्त्री यांनी निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये केएल राहुल आणि ऋतुराज गायकवाड यांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. ईशानला सलामीवीर म्हणून ब्रेक द्यावा किंवा त्याने तिसऱ्या क्रमांकावर प्रयत्न करू शकतो. चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर, पाचव्या क्रमांकावर ऋषभ पंत आणि त्यानंतर हार्दिक पांड्या फलंदाजीला यांची निवड केली आहे.


फिरकी गोलंदाजीसाठी अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल यांची निवड केली आहे. दुसरीकडे, रवी शास्त्रीने वेगवान गोलंदाजीसाठी भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. अर्शदीप किंवा उमरानला या दोघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवू शकता. भारतीय संघाला या वर्षी आशिया कप आणि टी-२० विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहे. अशा परिस्थितीत युवा खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी करून निवडकर्त्यांच्या नजरेत येण्याची चांगली संधी आहे.


रवी शास्त्री प्लेइंग इलेव्हन केएल राहुल, रुतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह/उमरान मलिक, हर्षल पटेल.

Comments
Add Comment

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

जोकोविचला नमवत कार्लोसची ऑस्ट्रेलियन ओपनला गवसणी

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन २०२६च्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या युवा खेळाडू कार्लोस