देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण, सात दिवस क्वारंटाईन

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्वीटरवरुन दिली आहे. सध्या ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. दरम्यान, संपर्कात आलेल्यांनी त्वरीत आपली तपासणी करुन घ्यावी असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच सर्वांनी स्वत: ची काळजी घ्यावी असेही फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.


https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1533340392157982725

कोरोना झाल्यानंतर साधारण सात दिवस क्वारंटाईन राहावे लागते. त्यामुळे १० जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीला देवेंद्र फडणवीस कसे उपस्थित राहणार, हे पाहावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारीच महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे या नेत्यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


देशात जीवघेण्या कोरोनाने डोके वर काढल्याचे दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४,२७० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढत आहे. अनेक नेते मंडळींसह बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनाही कोरोनाची लागण झाली आहे.

Comments
Add Comment

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री