मुंबई-गोवा मार्गावर दोन टोलनाक्यांवरील टोलवसुली तूर्त रद्द

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीने मुंबई-गोवा मार्गावर टोलविरोधी केलेल्या आंदोलनाला पहिल्या टप्प्यातच फार मोठे यश आले आहे. कणकवली ओसरगाव येथे बुधवारी १ जूनपासून सुरू होणारी टोलवसुली तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आली आहे.


उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, टोल कंपनीचे अधिकारी, महसूल प्रशासन आणि प्रकल्पग्रस्त तसेच टोलविरोधी तक्रार असणाऱ्या सर्व घटकांना एकत्र घेऊन याविषयी बैठक घेतली जाईल आणि त्यानंतर योग्य ती प्रक्रिया केली जाईल. तोपर्यंत बुधवारपासून सुरू होणारी टोलवसुली थांबवण्यात आली असल्याची माहिती कणकवलीच्या प्रांत अधिकारी वैशाली राजमाने यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ट्रक, टेम्पोचालक-मालकांनी ओसरगाव टोल नाक्याविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.


मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणावर ओसरगाव येथे असलेल्या टोल नाक्यावर १ जूनपासून टोल सुरू केला जाणार असल्याची माहिती कंपनीने दिली होती. त्यानंतर भाजपचे पदाधिकारी प्रांताधिकाऱ्यांना जाऊन प्रत्यक्ष भेटले व १ जूनपासून टोलवसुली केल्यास गंभीर परिणाम होतील, त्यापूर्वी प्रशासन अधिकारी व सर्वांची एकत्रित मीटिंग घ्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोल माफी द्या, बैठक झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका, अशी मागणी केली होती.


या मागणीनुसार, प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून एकत्रित बैठकीची विनंती केली. नंतर उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल, असे ठरले. सायंकाळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण परियोजना कोल्हापूरचे अधिकारी पी. डी. पंदरकर यांनी प्रांताधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली. जनतेचा उद्रेक होऊ नये म्हणून बैठकीत निर्णय होईपर्यंत उद्यापासून होणारी टोलवसुली स्थगित केली आहे, अशी माहिती वैशाली राजमाने यांनी दिली.

Comments
Add Comment

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय व

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.