तेंडुलकरने निवडला स्वप्नातला आयपीएल २०२२चा सर्वोत्तम संघ

  65

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलचा १५वा हंगाम सरला असला तरी त्याची झिंग अद्याप कायम आहे. त्यातूनच भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर याने त्याचा सर्वोत्तम आयपीएल २०२२ संघ निवडला आहे. त्यामध्ये सचिनने या मोसमातील सर्वोत्तम खेळाडूंना स्थान दिले आहे. सचिनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या संघाबाबत माहिती दिली आहे.


विशेष म्हणजे त्याने पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचाही समावेश केला आहे. सचिन म्हणाला, ‘शिखर धवन आणि जोस बटलर हे माझे सलामीवीर असतील. बटलरसाठी हा हंगाम चांगला आहे. धवनशिवाय इतर कोणताही फलंदाज त्याचा जोडीदार होऊ शकत नाही’. के. एल. राहुलला तिसऱ्या क्रमांकावर ठेवल्यानंतर सचिनने हार्दिक पंड्याला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून संघात घेतले आहे.


पंड्याबाबत सचिन म्हणाला, ‘चौथ्या क्रमांकावर असलेल्या हार्दिक पंड्याने या मोसमात जबरदस्त फॉर्म दाखविला आणि काही महत्त्वाच्या खेळी खेळल्या. त्याच्यात जबरदस्त ताकद आहे व त्याच्या बॅटचा स्विंग सुंदर आहे. या मोसमात हार्दिक हा सर्वोत्तम कर्णधार होता’.


सचिन तेंडुलकरचा संघ -


शिखर धवन, जोस बटलर, केएल राहुल, हार्दिक पांड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, लियाम लिव्हिंगस्टोन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), राशिद खान, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी