तेंडुलकरने निवडला स्वप्नातला आयपीएल २०२२चा सर्वोत्तम संघ

  71

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलचा १५वा हंगाम सरला असला तरी त्याची झिंग अद्याप कायम आहे. त्यातूनच भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर याने त्याचा सर्वोत्तम आयपीएल २०२२ संघ निवडला आहे. त्यामध्ये सचिनने या मोसमातील सर्वोत्तम खेळाडूंना स्थान दिले आहे. सचिनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या संघाबाबत माहिती दिली आहे.


विशेष म्हणजे त्याने पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचाही समावेश केला आहे. सचिन म्हणाला, ‘शिखर धवन आणि जोस बटलर हे माझे सलामीवीर असतील. बटलरसाठी हा हंगाम चांगला आहे. धवनशिवाय इतर कोणताही फलंदाज त्याचा जोडीदार होऊ शकत नाही’. के. एल. राहुलला तिसऱ्या क्रमांकावर ठेवल्यानंतर सचिनने हार्दिक पंड्याला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून संघात घेतले आहे.


पंड्याबाबत सचिन म्हणाला, ‘चौथ्या क्रमांकावर असलेल्या हार्दिक पंड्याने या मोसमात जबरदस्त फॉर्म दाखविला आणि काही महत्त्वाच्या खेळी खेळल्या. त्याच्यात जबरदस्त ताकद आहे व त्याच्या बॅटचा स्विंग सुंदर आहे. या मोसमात हार्दिक हा सर्वोत्तम कर्णधार होता’.


सचिन तेंडुलकरचा संघ -


शिखर धवन, जोस बटलर, केएल राहुल, हार्दिक पांड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, लियाम लिव्हिंगस्टोन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), राशिद खान, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

Comments
Add Comment

मोहम्मद सिराज आयसीसी क्रमवारीत १५ व्या स्थानावर

इंग्लंड मालिकेमुळे सिराजची १२ स्थानाची झेप नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल येथील पाचव्या आणि शेवटच्या

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी

भारतात परतल्यावर मोहम्मद सिराजचे भव्य स्वागत

हैदराबाद : इंग्लंडमधील जबरदस्त प्रदर्शनानंतर स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज बुधवार(दि.६) रोजी हैदराबादमध्ये परतले

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत

नोवाक जोकोविचची ‘सिनसिनाटी ओपन’मधून माघार

नवी दिल्ली : ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविचला आगामी यूएस ओपनपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. त्याने सिनसिनाटी

Team india: इंग्लंड मालिका संपली, आता पुढे टीम इंडियाचे असणार हे वेळापत्रक

मुंबई: इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ २०२५ च्या उर्वरित वर्षासाठी सज्ज झाला