तेंडुलकरने निवडला स्वप्नातला आयपीएल २०२२चा सर्वोत्तम संघ

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलचा १५वा हंगाम सरला असला तरी त्याची झिंग अद्याप कायम आहे. त्यातूनच भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर याने त्याचा सर्वोत्तम आयपीएल २०२२ संघ निवडला आहे. त्यामध्ये सचिनने या मोसमातील सर्वोत्तम खेळाडूंना स्थान दिले आहे. सचिनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या संघाबाबत माहिती दिली आहे.


विशेष म्हणजे त्याने पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचाही समावेश केला आहे. सचिन म्हणाला, ‘शिखर धवन आणि जोस बटलर हे माझे सलामीवीर असतील. बटलरसाठी हा हंगाम चांगला आहे. धवनशिवाय इतर कोणताही फलंदाज त्याचा जोडीदार होऊ शकत नाही’. के. एल. राहुलला तिसऱ्या क्रमांकावर ठेवल्यानंतर सचिनने हार्दिक पंड्याला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून संघात घेतले आहे.


पंड्याबाबत सचिन म्हणाला, ‘चौथ्या क्रमांकावर असलेल्या हार्दिक पंड्याने या मोसमात जबरदस्त फॉर्म दाखविला आणि काही महत्त्वाच्या खेळी खेळल्या. त्याच्यात जबरदस्त ताकद आहे व त्याच्या बॅटचा स्विंग सुंदर आहे. या मोसमात हार्दिक हा सर्वोत्तम कर्णधार होता’.


सचिन तेंडुलकरचा संघ -


शिखर धवन, जोस बटलर, केएल राहुल, हार्दिक पांड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, लियाम लिव्हिंगस्टोन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), राशिद खान, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत