'तो' पून्हा येतोय...!

नवी दिल्ली : कोरोना परतीच्या वाटेवर आहे असे वाटत असतानाच पुन्हा एकदा आकडेवारीने धडकी भरवली आहे. रविवारी गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक बाधित महाराष्ट्रात आढळून आल्याने चिंता वाढली आहे. दिवसागणिक राज्यामध्ये केसेस वाढल्याचे दिसून येत आहे.


देशात गेल्या २४ तासांत २७०६ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या आधीच्या दिवसाच्या तुलनेत कमी आहे. नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील घट झाली आहे.


त्याआधीच्या दिवशी २८२८ नवे कोरोना रुग्ण आणि १४ जणांचा मृत्यू झाला. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १७ हजारांवर पोहोचली आहे. सध्या भारतात १७ हजार ६९८ इतके कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.


देशात रविवारी दिवसभरात २ हजार ७० रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. यामुळे देशात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४ कोटी २६ लाख १३ हजार ४४० वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या २५ नवीन मृत्यूंसह कोरोना बळींची संख्या ५ लाख २५ हजार ६११ वर पोहचली आहे.



रविवारी गेल्या तीन महिन्यांतील सर्वाधिक बाधितांची नोंद


राज्यात रविवारी नव्या ५५० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. गेल्या चार दिवसांपासून पाचशेवर रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मागील चार दिवसांमध्ये बाधितांचा आकडा २ हजारांवर गेला आहे.


यापूर्वी राज्यात एक मार्च रोजी कोरोनाचे सर्वाधिक बाधित (६७५) आढळले होते. दुसरीकडे मुंबईमध्ये तब्बल १०८ दिवसांनी कोरोनाच्या दैनंदिन बाधितांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईमधील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ हजार, तर राज्यातील एकूण संख्या २ हजार ९९७ झाली आहे.


गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या दोन आकड्यांमध्ये गेली आहे. रविवारी १७ बाधित रुग्णालयात दाखल झाले. सेव्हन हिल्स डेप्युटी डीन डॉ. स्मिता चव्हाण यांनी यांनी सांगितले की, २५ कोरोना वॉर्डमध्ये, तर १० आयसीयू वॉर्डमध्ये दाखल आहेत.

Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन