'तो' पून्हा येतोय...!

  73

नवी दिल्ली : कोरोना परतीच्या वाटेवर आहे असे वाटत असतानाच पुन्हा एकदा आकडेवारीने धडकी भरवली आहे. रविवारी गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक बाधित महाराष्ट्रात आढळून आल्याने चिंता वाढली आहे. दिवसागणिक राज्यामध्ये केसेस वाढल्याचे दिसून येत आहे.


देशात गेल्या २४ तासांत २७०६ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या आधीच्या दिवसाच्या तुलनेत कमी आहे. नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील घट झाली आहे.


त्याआधीच्या दिवशी २८२८ नवे कोरोना रुग्ण आणि १४ जणांचा मृत्यू झाला. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १७ हजारांवर पोहोचली आहे. सध्या भारतात १७ हजार ६९८ इतके कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.


देशात रविवारी दिवसभरात २ हजार ७० रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. यामुळे देशात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४ कोटी २६ लाख १३ हजार ४४० वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या २५ नवीन मृत्यूंसह कोरोना बळींची संख्या ५ लाख २५ हजार ६११ वर पोहचली आहे.



रविवारी गेल्या तीन महिन्यांतील सर्वाधिक बाधितांची नोंद


राज्यात रविवारी नव्या ५५० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. गेल्या चार दिवसांपासून पाचशेवर रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मागील चार दिवसांमध्ये बाधितांचा आकडा २ हजारांवर गेला आहे.


यापूर्वी राज्यात एक मार्च रोजी कोरोनाचे सर्वाधिक बाधित (६७५) आढळले होते. दुसरीकडे मुंबईमध्ये तब्बल १०८ दिवसांनी कोरोनाच्या दैनंदिन बाधितांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईमधील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ हजार, तर राज्यातील एकूण संख्या २ हजार ९९७ झाली आहे.


गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या दोन आकड्यांमध्ये गेली आहे. रविवारी १७ बाधित रुग्णालयात दाखल झाले. सेव्हन हिल्स डेप्युटी डीन डॉ. स्मिता चव्हाण यांनी यांनी सांगितले की, २५ कोरोना वॉर्डमध्ये, तर १० आयसीयू वॉर्डमध्ये दाखल आहेत.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे