हार्दिक-नेहराच्या गेम प्लानने केले गुजरातला चॅम्पियन

अहमदाबाद : आयपीएल २०२२च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. आपली पहिलीच आयपीएल खेळणाऱ्या ‘गुजरात टायटन्स’ला ही सर्वोत्तम कामगिरी करण्यात यश आले आहे. खेळाडूंचा लिलाव झाल्यानंतर आणि स्पर्धेच्या सुरूवातीला कुणीच गुजरात टायटन्सना आयपीएल जिंकण्यासाठी दावेदार धरले नव्हते.


गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्या याला लिलावाआधी विकत घेऊन कर्णधार केले, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले होते, कारण त्याच्या फिटनेसचा प्रश्न उभा होता. टी-२० वर्ल्ड कपमधल्या खराब कामगिरीनंतर हार्दिक हा टीम इंडियाबाहेर गेला, तसेच तो त्यानंतर क्रिकेटही खेळत नव्हता, पण आयपीएलमध्ये हार्दिक पूर्णपणे फिट होऊन परतला.


रोहित शर्माकडून कॅप्टन्सीचे गूण शिकलेल्या हार्दिकने तीच रणनिती गुजरातच्या टीममध्ये राबवली. आर. साई किशोर, यश दयाळ यांच्यासारख्या युवा खेळाडूंवर त्याने विश्वास दाखवला. गुजरातचा ओपनर शुभमन गिल चांगल्या सुरूवातीनंतर आयपीएलच्या मधल्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरत होता, पण तरीही हार्दिक त्याच्या रणनितीवर ठाम राहिला व याचा फायदा त्यांना झाला आणि लीग स्टेजनंतर पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर राहिला.


कोच आशिष नेहरा याचा मैदानाबाहेरचा गेम प्लान यशस्वी ठरला. जवळपास सगळेच कोच लॅपटॉप आणि तंत्रज्ञानाचा वापर करत होते, पण आशिष नेहरा याला अपवाद ठरला. लिलावामध्येही नेहरा ऑक्शन टेबलवर बसून बोली लावत होता. नेहराने ऑक्शन टेबलवर आणि आयपीएलदरम्यान मैदानाबाहेरही रणनिती साधी आणि सरळ ठेवली.


फिनिशरची उत्तम कामगिरी...


डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया आणि राशिद खान या फिनिशरनी गुजरात टायटन्सना अनेक रोमांचक विजय मिळवून दिले. गुजरातने या मोसमात ९ सामन्यांमध्ये आव्हानाचा पाठलाग केला. त्यातल्या ८ मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेल्या आणि ७ मॅचमध्ये गुजरातचा विजय झाला.


युवा-अनुभवी खेळाडूंचे मिश्रण


गुजरात टायटन्सकडे या मोसमात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण होते. साई किशोर, अभिनव मनोहर, यश दयाळ, दर्शन नालकंडे, या नवख्या खेळाडूंनी त्यांना मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याशिवाय हार्दिक, राशिद, गिल, मिलर, शमी आणि तेवातिया या आयपीएलचा अनुभव असलेल्या खेळाडूंनीही एकहाती मॅच जिंकवून दिल्या.


ट्रोलिंग करणाऱ्यांना मैदानात दिले उत्तर....


आयपीएल साठी झालेल्या लिलावानंतर गुजरातच्या टीमचे मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग करण्यात आले, पण त्यांनी या सगळ्याचे मैदानात उत्तर दिले. लिलावामध्ये गुजरातने सुरूवातीला विकेट कीपरलाच विकत घेतले नव्हते, अखेरच्या तासामध्ये गुजरातने ऋद्धीमान साहा आणि मॅथ्यू वेडवर बोली लावली. ऋद्धीमान साहाने या मोसमात धमाका केला. साहाने ११ सामन्यांमध्ये ३१.७० च्या सरासरीने आणि १२२.३९ च्या स्ट्राईक रेटने ३१७ धावा केल्या.

Comments
Add Comment

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात