हार्दिक-नेहराच्या गेम प्लानने केले गुजरातला चॅम्पियन

अहमदाबाद : आयपीएल २०२२च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. आपली पहिलीच आयपीएल खेळणाऱ्या ‘गुजरात टायटन्स’ला ही सर्वोत्तम कामगिरी करण्यात यश आले आहे. खेळाडूंचा लिलाव झाल्यानंतर आणि स्पर्धेच्या सुरूवातीला कुणीच गुजरात टायटन्सना आयपीएल जिंकण्यासाठी दावेदार धरले नव्हते.


गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्या याला लिलावाआधी विकत घेऊन कर्णधार केले, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले होते, कारण त्याच्या फिटनेसचा प्रश्न उभा होता. टी-२० वर्ल्ड कपमधल्या खराब कामगिरीनंतर हार्दिक हा टीम इंडियाबाहेर गेला, तसेच तो त्यानंतर क्रिकेटही खेळत नव्हता, पण आयपीएलमध्ये हार्दिक पूर्णपणे फिट होऊन परतला.


रोहित शर्माकडून कॅप्टन्सीचे गूण शिकलेल्या हार्दिकने तीच रणनिती गुजरातच्या टीममध्ये राबवली. आर. साई किशोर, यश दयाळ यांच्यासारख्या युवा खेळाडूंवर त्याने विश्वास दाखवला. गुजरातचा ओपनर शुभमन गिल चांगल्या सुरूवातीनंतर आयपीएलच्या मधल्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरत होता, पण तरीही हार्दिक त्याच्या रणनितीवर ठाम राहिला व याचा फायदा त्यांना झाला आणि लीग स्टेजनंतर पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर राहिला.


कोच आशिष नेहरा याचा मैदानाबाहेरचा गेम प्लान यशस्वी ठरला. जवळपास सगळेच कोच लॅपटॉप आणि तंत्रज्ञानाचा वापर करत होते, पण आशिष नेहरा याला अपवाद ठरला. लिलावामध्येही नेहरा ऑक्शन टेबलवर बसून बोली लावत होता. नेहराने ऑक्शन टेबलवर आणि आयपीएलदरम्यान मैदानाबाहेरही रणनिती साधी आणि सरळ ठेवली.


फिनिशरची उत्तम कामगिरी...


डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया आणि राशिद खान या फिनिशरनी गुजरात टायटन्सना अनेक रोमांचक विजय मिळवून दिले. गुजरातने या मोसमात ९ सामन्यांमध्ये आव्हानाचा पाठलाग केला. त्यातल्या ८ मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेल्या आणि ७ मॅचमध्ये गुजरातचा विजय झाला.


युवा-अनुभवी खेळाडूंचे मिश्रण


गुजरात टायटन्सकडे या मोसमात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण होते. साई किशोर, अभिनव मनोहर, यश दयाळ, दर्शन नालकंडे, या नवख्या खेळाडूंनी त्यांना मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याशिवाय हार्दिक, राशिद, गिल, मिलर, शमी आणि तेवातिया या आयपीएलचा अनुभव असलेल्या खेळाडूंनीही एकहाती मॅच जिंकवून दिल्या.


ट्रोलिंग करणाऱ्यांना मैदानात दिले उत्तर....


आयपीएल साठी झालेल्या लिलावानंतर गुजरातच्या टीमचे मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग करण्यात आले, पण त्यांनी या सगळ्याचे मैदानात उत्तर दिले. लिलावामध्ये गुजरातने सुरूवातीला विकेट कीपरलाच विकत घेतले नव्हते, अखेरच्या तासामध्ये गुजरातने ऋद्धीमान साहा आणि मॅथ्यू वेडवर बोली लावली. ऋद्धीमान साहाने या मोसमात धमाका केला. साहाने ११ सामन्यांमध्ये ३१.७० च्या सरासरीने आणि १२२.३९ च्या स्ट्राईक रेटने ३१७ धावा केल्या.

Comments
Add Comment

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल