डिजिटल पेमेंट : भारताने टाकले विकसित देशांना मागे!

मुंबई (वृत्तसंस्था) : २०१३-१४ मध्ये भारतात डिजिटल पेमेंट सिस्टिमचा फारसा प्रसार झाला नव्हता; मात्र २०१४ मध्ये भारतात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर डिजिटल पेमेंटमध्ये मोठी वाढ झाली. आता तर भारताने अनेक विकसित देशांना डिजिटल पेमेंटच्या बाबतीत मागे टाकले आहे.


भारतात २०१४ पूर्वी होणाऱ्या आर्थिक व्यवहारांमधले अनेक आर्थिक व्यवहार किंवा पैशांची देवाण-घेवाण चेक किंवा रोखीच्या स्वरुपात व्हायची. तेव्हा ई-पेमेंटचा पर्याय उपलब्ध होता; मात्र फार थोडे लोक त्याचा उपयोग करत होते. २०१३-१४ च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते की, २०१३-१४ या आर्थिक वर्षात ऑनलाईन पद्धतीने एकूण २२० कोटी रुपयांचेच आर्थिक व्यवहार झाले होते. रोख पद्धतीने करण्यात येणाऱ्या पैशांच्या देवाणघेवाणीमुळे टॅक्सची चोरी वाढते. त्यामुळेच केंद्रात सत्तेत येताच मोदी सरकारने जास्तीत जास्त व्यवहार डिजिटल पद्धतीने व्हावेत यावर भर दिला.


मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार २०१४ मध्ये पहिल्यांदा केंद्रात सत्तेत आले तेव्हा केंद्र सरकारने सर्वात आधी डिजिटल पेमेंट पद्धतीला प्रोत्साहन देण्याचे काम हाती घेतले. याचा परिणाम आज आपल्याला दिसून येत आहे. आज जवळपास भारतातला एक मोठा वर्ग पैशांच्या देवाणघेवाणीसाठी डिजिटल पेमेंट पद्धतीचाच वापर करत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका राहिली ती स्मार्टफोनची. स्मार्टफोनमुळे ऑनलाईन पद्धतीने पैशांचे व्यवहार करणे अधिक सोपे झाले. पैशांचे डिजिटल व्यवहार वाढल्यामुळे कर चोरीला मोठ्या प्रमाणात आळा बसला. सोबतच मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात जवळपास ४५ कोटी जनधन खाती उघडण्यात आली.


या खात्यांमुळे डिजिटल पेमेंट सिस्टिम अधिक मजबूत झाली. २०२०-२१ या आर्थिक वर्षात जवळपास ५५५४ कोटी रुपयांचे व्यवहार डिजिटल मार्गाने झाले तर २०२१-२२ मध्ये हाच आकडा वाढून ७४२२ कोटी रुपयांवर पोहोचला.भारतामध्ये डिजिटल पेमेंटचा एवढ्या वेगाने प्रसार होत आहे की २०२०-२०२१ मध्ये भारताने चीन, दक्षिण कोरिया सारख्या देशांना देखील डिजिटल व्यवहारांमध्ये मागे टाकले.

Comments
Add Comment

महापौर, गटनेते, अध्यक्ष यांच्या दालनाच्या कामाची आयुक्तांनी केली पाहणी

येत्या १५ दिवसाच्या आत सर्व दालने सुस्थितीत करून ठेवा, असे दिले निर्देश मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या

मुंबईत २०२६ च्या अखेरीस सुरू होणार जोगेश्वरी टर्मिनस

मुंबई : मुंबईत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर टर्मिनस, कुर्ला टर्मिनस, मुंबई सेंट्रल टर्मिनस, वांद्रे

Santosh Dhuri on Raj Thackeray : "राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर, मनसेवर आता उद्धव ठाकरेंचा ताबा!"; भाजप प्रवेशानंतर संतोष धुरींची पहिलीच डरकाळी

मुंबई : मुंबईच्या राजकारणात मंगळवारी मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) फायरब्रँड नेते आणि

Nitesh Rane : "उद्धव ठाकरे नाही, तर ते 'उद्धव वाकरे'...नितेश राणेंचा घणाघात!

अमित साटम यांच्या आडनावावरून केलेल्या विधानामुळे राणे आक्रमक मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या

बनावट एबी फॉर्मचा आरोप न्यायालयात; सायन कोळीवाडा वादावर उच्च न्यायालयाचा तातडीच्या सुनावणीस नकार

मुंबई : महापालिका निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर सायन कोळीवाडा मतदारसंघातील वाद थेट मुंबई उच्च न्यायालयात

घर खरेदीदारांना मिळणार प्रकल्पाची अद्ययावत माहिती

मुंबई : जर आपल्या शहरामध्ये एखादा गृह प्रकल्प सुरू असेल आणि त्या गृह प्रकल्पामध्ये घर खरेदीदारांना घराची खरेदी