विधिमंडळाची दोन्ही सभागृहे देणार अजितदादांच्या आठवणींना उजाळा

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांत राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. बारामतीचा तो दुर्दैवी विमान अपघात घडला नसता, तर यंदा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यासाठी अजित पवार स्वतः उभे राहिले असते; मात्र नियतीच्या फेऱ्यामुळे आता त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याची वेळ सभागृहावर आली आहे.


विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील गोंधळ म्हणजे कामकाज, असा समज रूढ होत असतानाच्या काळात अजित पवार हे संसदीय कामकाजाचे गांभीर्य आणि नियमावलीबाबत अत्यंत आग्रही असत. वैधानिक कामांबाबत असलेली त्यांची आस्था आणि प्रशासनावरील पकड याची उणीव या अधिवेशनात प्रकर्षाने जाणवणार आहे. शोकप्रस्तावावेळी सर्व पक्षांचे गटनेते आपल्या भावना मांडतील, तसेच प्रत्येक पक्षाच्या तीन सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाईल. यावेळी सभागृहात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची उपस्थिती असणार असल्याने हा क्षण अत्यंत भावूक ठरणार आहे.



वरळीत शोकसभेचे आयोजन


दरम्यान, सोमवारी सायंकाळी वरळी येथील 'एनएससीआय डोम' येथे भव्य सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. राजकीय मतभेद बाजूला सारून राज्यातील आणि देशातील दिग्गज नेते एकाच मंचावर येऊन अजित दादांना अभिवादन करतील. या शोकसभेला सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंचे नेते उपस्थित राहणार आहेत. यात प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासह विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांचा समावेश असणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai Water Storage : मुंबईवर पाणीटंचाईचं सावट गडद: तलावांत १८.८६ टक्के साठा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या केवळ १८.८६% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाईची

BMC अभियंत्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा ?

मुंबई : महानगरपालिकेच्या मध्यवर्ती अभियांत्रिकी विभागामध्ये पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू असला तरीही

MSRTC : ST BUS साठी उड्डाणपुलांखाली चार्जिंग स्टेशन उभारणार

मुंबई : राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रिक बस अर्थात ‘लालपरी’साठी पुलांखालच्या मोकळ्या जागांचा

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोमातेच्या अवैध वाहतुकीविरोधात राज्य सरकारचा बुलडोझर; कठोर कारवाईचे आदेश— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

मुंबई : आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोमातेची अवैध वाहतूक, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवर

IPL प्रसारणामधील “सलाम मुंबई” ऐवजी “नमस्कार मुंबई” प्रदर्शित करण्याची भाजयुमो, मुंबई अध्यक्ष दिपक सिंह यांची मागणी

IPL  2026 : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष श्री दिपक सिंह यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री

लॉजिस्टिक्स आणि कनेक्टिव्हिटीचे नवे पॉवरहाऊस - नागपूर!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 'गोदाम लॉजिस्टिक्स पार्क'चा भव्य