तारकर्लीजवळ पर्यटकांची बोट बुडाली; दोन पर्यटकांचा मृत्यू

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग किल्ल्याशेजारी मालवणमधील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पर्यटनासाठी गेलेली बोट समुद्रात उलटून अपघात झाला आहे. जय गजानन नावाच्या या बोटीत तब्बल २० पर्यटक होते. त्यातील दोघे पर्यटक बुडल्याची माहिती मिळत असून काही पर्यटक गंभीर जखमी आहेत.


ही बोट जवळपास २० पर्यटकांना घेऊन स्कुबा डायव्हिंगसाठी गेली होती. स्कुबा डायव्हिंग करुन परत येताना समुद्रकिनाऱ्याजवळ बोट बुडाली. यात दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. काही गंभीर जखमींना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. उपचार घेणाऱ्यांमध्ये लहान मुले व महिलांचा समावेश आहे.


प्रशासनाने या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली असून बोट चालक आणि मालकावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बोटीची प्रवासी क्षमता किती होती, या सर्व पर्यटकांना लाईफ जॅकेट देण्यात आले होते का अशाप्रकारच्या सूचनाही दिल्या आहे. पोलीस आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी हजर आहेत. या दुर्घटनेत कोणताही हलगर्जीपणा झाला असेल तर चालक आणि मालकावर कारवाई केली जाईल, असे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात