देशात २२२६ नवे कोरोना रूग्ण

नवी दिल्ली (हिं.स.) : गेल्या २४ तासात देशात २२२६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे ६५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कालच्या तुलनेत आज कोरोवा रुग्णांच्या संख्येत थोडीशी घट झाली आहे. काल देशात २ हजार ३२३ नवे कोरोना रुग्ण आढळले होते तर, २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे रविवारी जाहीर झालेल्या आकडेवारीत मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यापूर्वी २१ मे रोजी कोरोनाचे एकूण २ हजार ३२३ नवीन रुग्ण आढळून आले होते आणि २५ जणांचा मृत्यू झाला होता. आज २ हजार २२६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर ६५ जणांचा मृ्त्यू झाला आहे. दरम्यान, सक्रिय प्रकरणांमध्ये आता थोडीशी घट झाली आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजारांवरुन आता १४ हजार ९५५ वर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जवळपास २ हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढली आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोविड-१९ च्या रुग्णांच्या संख्येत ४१ प्रकरणांची घट नोंदवण्यात आली आहे. संसर्गाचा दैनंदिन दर ०.५० टक्के नोंदवला गेला तर साप्ताहिक संसर्ग दर देखील ०.५० टक्के होता. आत्तापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्या ही ४ कोटी २५ लाख ९७ हजार ३ झाली आहे, तर मृत्यूचे प्रमाण १.२२ टक्के नोंदवले गेले आहे. देशव्यापी अँटी-कोविड-१९ लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १९२.२८ कोटी लसींचे डोस देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी