कणकवली येथे उद्यापासून सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव

  117

कणकवली (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाच्या पुढाकाराने व केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली येथे २१ ते २३ मे या कालावधीत सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे स्टेशन रोडनजीक, कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर हे प्रदर्शन भरविले जाणार आहे. पूर्णत: मोफत प्रवेश असणाऱ्या या प्रदर्शनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. देशातील विविध उद्योजकांचे स्टॉल या प्रदर्शनात मांडले जाणार असून नवउद्योजकांना हे प्रदर्शन पर्वणी ठरणार आहे.


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन २१ मे रोजी होणार आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या गाठीभेटी या प्रदर्शन आणि विक्री मेळाव्यात असणार आहेत. होतकरू तरुणांना आपला उद्योगव्यवसाय करण्यासाठी बँकिंग लोन मेळावा, कोकणातील तरुण उद्योजकांना सरकारी कंपन्यांसोबत व्यवसाय करण्याची संधी या महोत्सवातून मिळणार आहे.


विक्रेता आणि खरेदीदार एकाच छताखाली आणण्याची कल्पना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आणली असून याचा फायदा उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन एमएसएमई मंत्रालय भारत सरकार यांनी केले आहे.

Comments
Add Comment

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले