दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये पाण्याची बोंब


  •  बेसिन-टॉयलेटसाठी प्रवाशांनी वापरले बिसलरीचे पाणी

  •  प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे तीव्र असंतोष


रत्नागिरी (वार्ताहर) : दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये बहुसंख्य डब्यात बेसिनसह टॉयलेटमध्ये पाण्याचा खडखडाट असल्याने शेकडो प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रवासी वर्गातून असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये अनेकदा पाणीच नसल्याचा प्रकार वारंवार घडत असल्याने प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत एक्स्प्रेसमध्ये पाण्याची बोंब असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.


मे महिन्यात ऐन गर्दीच्या मोसमात हजारो प्रवासी कोकण रेल्वेने प्रवास करीत असताना शुक्रवारी दिव्याहून सावंतवाडीला जाणाऱ्या दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये बहुसंख्य डब्यांमध्ये बेसिनसह टॉयलेटमध्ये पाण्याचा खडखडाट असल्याने शेकडो प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. यापूर्वीही सतत असे प्रकार घडत असल्याने प्रवासी वर्गातून असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.


कोकण रेल्वे मार्गावर दररोज दिव्याहून सावंतवाडीसाठी सुटणारी १०१०५ या दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसचे रूप अलीकडच्या काळात चांगलेच बदलण्यात आलेले आहे. मात्र, बाह्यरूप बदललेले असले तरी या एक्स्प्रेसमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवण्याचे प्रकार सतत घडत आहेत. त्यामुळे बाह्यरूप बदललेल्याने सुखावणारे प्रवासी नंतर गाडीत गेल्यावर तेथे पाण्याचा तुटवडा आढळल्यावर हिरमुसले होतात. या एक्स्प्रेसच्या बहुसंख्य डब्यातील टॉयलेटसह बेसीनमध्ये १३ मे रोजी पाणीच नव्हते, अशी माहिती हाती आली आहे.


त्यामुळे एक्स्प्रेसमधील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. अनेक प्रवाशांनी तर बिसलेरी पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन बेसिनमध्ये तोंड धुतले, तर काही प्रवाशांनी पाण्याच्या बाटल्या घेऊन टॉयलेट गाठले. त्यामुळे बहुतांश डब्यात बेसीनसह टॉयलेटमध्ये पाण्याच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसला. या गंभीर प्रश्नाकडे कोकण रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

समृद्ध पंचायतराज अभियानातून राज्यात सर्वाधिक बक्षिसे मतदार संघाने मिळवावीत: ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम

समृद्ध पंचायतराज अभियानासाठी विशेष प्रयत्न करा दापोली: ग्रामविकास व पंचायतीराज विभागामार्फत राबविण्यात

भक्ती मयेकर खून प्रकरणात मोठा ट्विस्ट: आरोपी दुर्वास पाटीलच्या वडिलांचीही चौकशी, बारमधून महत्त्वाचा पुरावा जप्त

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील तिहेरी खून प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. मुख्य

पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षण भिंत कोसळल्याने गणेशोत्सवात सीएनजीचा पुरवठा बंद; वाहनचालकांची धावपळ

मंडणगड: गणेशोत्सवादरम्यान मंडणगडमधील एकमेव सीएनजी पंप बंद झाल्याने स्थानिक वाहनचालक आणि गणेशभक्तांची मोठी

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर ५ गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर टोल प्लाझाजवळ कार आणि ट्रकची टक्कर रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील

गणेश विसर्जनानिमित्ताने उद्यापासून रत्नागिरीत वाहतुकीच्या मार्गात बदल

रत्नागिरी:  गणेश विसर्जना निमित्ताने दिनांक २, ४, ६ आणि ७ सप्टेंबरला रत्नागिरी शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल