दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये पाण्याची बोंब

  90


  •  बेसिन-टॉयलेटसाठी प्रवाशांनी वापरले बिसलरीचे पाणी

  •  प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे तीव्र असंतोष


रत्नागिरी (वार्ताहर) : दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये बहुसंख्य डब्यात बेसिनसह टॉयलेटमध्ये पाण्याचा खडखडाट असल्याने शेकडो प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रवासी वर्गातून असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये अनेकदा पाणीच नसल्याचा प्रकार वारंवार घडत असल्याने प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत एक्स्प्रेसमध्ये पाण्याची बोंब असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.


मे महिन्यात ऐन गर्दीच्या मोसमात हजारो प्रवासी कोकण रेल्वेने प्रवास करीत असताना शुक्रवारी दिव्याहून सावंतवाडीला जाणाऱ्या दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये बहुसंख्य डब्यांमध्ये बेसिनसह टॉयलेटमध्ये पाण्याचा खडखडाट असल्याने शेकडो प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. यापूर्वीही सतत असे प्रकार घडत असल्याने प्रवासी वर्गातून असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.


कोकण रेल्वे मार्गावर दररोज दिव्याहून सावंतवाडीसाठी सुटणारी १०१०५ या दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसचे रूप अलीकडच्या काळात चांगलेच बदलण्यात आलेले आहे. मात्र, बाह्यरूप बदललेले असले तरी या एक्स्प्रेसमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवण्याचे प्रकार सतत घडत आहेत. त्यामुळे बाह्यरूप बदललेल्याने सुखावणारे प्रवासी नंतर गाडीत गेल्यावर तेथे पाण्याचा तुटवडा आढळल्यावर हिरमुसले होतात. या एक्स्प्रेसच्या बहुसंख्य डब्यातील टॉयलेटसह बेसीनमध्ये १३ मे रोजी पाणीच नव्हते, अशी माहिती हाती आली आहे.


त्यामुळे एक्स्प्रेसमधील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. अनेक प्रवाशांनी तर बिसलेरी पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन बेसिनमध्ये तोंड धुतले, तर काही प्रवाशांनी पाण्याच्या बाटल्या घेऊन टॉयलेट गाठले. त्यामुळे बहुतांश डब्यात बेसीनसह टॉयलेटमध्ये पाण्याच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसला. या गंभीर प्रश्नाकडे कोकण रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

कोकणात मुसळधार, राजापूर-चिपळूणमध्ये हाहाकार!

मंदिर - घरांमध्ये पाणी शिरले तर रस्ते व पुलांची दुर्दशा रत्नागिरी : जिल्हयात सक्रिय झालेल्या मान्सूनने चांगलाच

रत्नागिरी : तब्बल ३७ वर्षांनी आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरात पुराचे पाणी!

रत्नागिरी : राजापुर तालुक्यात काल रात्रीपासून पावसाचा कहर झाला आहे. श्रीक्षेत्र आडिवरे येथील श्री महाकाली

शॉक लागल्यामुळे १३ वर्षांच्या मुलीचा तडफडून मृत्यू

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली येथे शॉक लागून १३ वर्षांच्या स्वरांगी गिजमचा तडफडून मृत्यू झाला.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण

आगामी स्थािनक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा

आमदार निलेश राणे यांचे आवाहन चिपळूण : कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण यांच वेगळं नातं आहे, ते कधीच तुटू शकत नाही.