दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये पाण्याची बोंब


  •  बेसिन-टॉयलेटसाठी प्रवाशांनी वापरले बिसलरीचे पाणी

  •  प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे तीव्र असंतोष


रत्नागिरी (वार्ताहर) : दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये बहुसंख्य डब्यात बेसिनसह टॉयलेटमध्ये पाण्याचा खडखडाट असल्याने शेकडो प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रवासी वर्गातून असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये अनेकदा पाणीच नसल्याचा प्रकार वारंवार घडत असल्याने प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत एक्स्प्रेसमध्ये पाण्याची बोंब असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.


मे महिन्यात ऐन गर्दीच्या मोसमात हजारो प्रवासी कोकण रेल्वेने प्रवास करीत असताना शुक्रवारी दिव्याहून सावंतवाडीला जाणाऱ्या दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये बहुसंख्य डब्यांमध्ये बेसिनसह टॉयलेटमध्ये पाण्याचा खडखडाट असल्याने शेकडो प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. यापूर्वीही सतत असे प्रकार घडत असल्याने प्रवासी वर्गातून असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.


कोकण रेल्वे मार्गावर दररोज दिव्याहून सावंतवाडीसाठी सुटणारी १०१०५ या दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसचे रूप अलीकडच्या काळात चांगलेच बदलण्यात आलेले आहे. मात्र, बाह्यरूप बदललेले असले तरी या एक्स्प्रेसमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवण्याचे प्रकार सतत घडत आहेत. त्यामुळे बाह्यरूप बदललेल्याने सुखावणारे प्रवासी नंतर गाडीत गेल्यावर तेथे पाण्याचा तुटवडा आढळल्यावर हिरमुसले होतात. या एक्स्प्रेसच्या बहुसंख्य डब्यातील टॉयलेटसह बेसीनमध्ये १३ मे रोजी पाणीच नव्हते, अशी माहिती हाती आली आहे.


त्यामुळे एक्स्प्रेसमधील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. अनेक प्रवाशांनी तर बिसलेरी पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन बेसिनमध्ये तोंड धुतले, तर काही प्रवाशांनी पाण्याच्या बाटल्या घेऊन टॉयलेट गाठले. त्यामुळे बहुतांश डब्यात बेसीनसह टॉयलेटमध्ये पाण्याच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसला. या गंभीर प्रश्नाकडे कोकण रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Comments
Add Comment

मोबाईल नेटवर्कसाठी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

रत्नागिरी : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी

मडगाव, रत्नागिरी, उडुपी या स्थानकांमध्ये ‘५ जी’ नेटवर्कची जोडणी

मुंबई : कोकण रेल्वेच्या प्रमुख स्थानकात आणि कोकण रेल्वेच्या अखत्यारितील रेल्वेगाड्यांमध्ये ‘५ जी’ नेटवर्क

देवरूखच्या ‘सप्तलिंगी लाल भात’ची राष्ट्रीय बाजारात चमक

संगमेश्वर तालुक्याला मिळणार नवी ओळख देवरूख (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुक्यातील सुपीक जमीन, सप्तलिंगी नदीचे

महायुतीतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जाणार

ना. उदय सामंत यांची घोषणा महायुतीचा अखेर सस्पेन्स संपला नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांची

महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे : मंत्री नितेश राणे

रत्नागिरी : महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे हा संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून

महिलांच्या सक्षमीकरणातच हिंदू राष्ट्राचे सक्षमीकरण : मंत्री नितेश राणे

गणेशगुळे येथे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या शिलालेखाचे अनावरण राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका