एक जूनपासून यांत्रिकी नौकांना सागरी मासेमारी बंदी

रत्नागिरी (हिं. स.) : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम आणि सुधारणा अध्यादेशान्वये यावर्षी येत्या १ जूनपासून ३१ जुलैपर्यंत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय सागरी क्षेत्रात यांत्रिक नौकांनी मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या बंदी कालावधीत सागरी कायद्याचा भंग करुन मासेमारी करणारे मच्छिमार खालील कारवाईस पात्र होतील, असे सूचित करण्यात आले आहे.


ही पावसाळी मासेमारी बंदी यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील. पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगरयांत्रिकी नौकांना ती लागू राहणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर म्हणजे सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांच्या पुढे खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांना केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे आदेश लागू राहतील. सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास नौका, नौकेवर बसविलेली उपसाधने आणि मासेमारी सामग्री तसेच त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल. तसेच जास्तीत जास्त कठोर शिक्षा केली जाईल.


सर्व मच्छिमारी सहकारी संस्था, त्यांचे नौकामालक सभासद आणि अन्य संबंधितांनी याची नोंद घेऊन विहित बंदी कालावधीत यांत्रिकी नौकांद्वारे सागरात मासेमारी केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. असे आवाहन मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.

Comments
Add Comment

महायुतीतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जाणार

ना. उदय सामंत यांची घोषणा महायुतीचा अखेर सस्पेन्स संपला नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांची

महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे : मंत्री नितेश राणे

रत्नागिरी : महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे हा संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून

महिलांच्या सक्षमीकरणातच हिंदू राष्ट्राचे सक्षमीकरण : मंत्री नितेश राणे

गणेशगुळे येथे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या शिलालेखाचे अनावरण राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका

शासकीय कामकाजात 'पेंडिंग' शब्दच नको!

जनतेच्या कामाचा तत्काळ निपटारा करा : खासदार नारायण राणे रत्नागिरी : अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला कोकणाच्या सौंदर्याची भूरळ! विजय देवरकोंडाच्या आगामी चित्रपटाचे रत्नागिरीमध्ये शुटींग सुरू

रत्नागिरी: कोकणातील डोंगररांगा, बारमाही वाहणाऱ्या नद्या, स्थापत्य, संस्कृती यामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्याची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार