रत्नागिरी (हिं. स.) : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम आणि सुधारणा अध्यादेशान्वये यावर्षी येत्या १ जूनपासून ३१ जुलैपर्यंत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय सागरी क्षेत्रात यांत्रिक नौकांनी मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या बंदी कालावधीत सागरी कायद्याचा भंग करुन मासेमारी करणारे मच्छिमार खालील कारवाईस पात्र होतील, असे सूचित करण्यात आले आहे.
ही पावसाळी मासेमारी बंदी यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील. पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगरयांत्रिकी नौकांना ती लागू राहणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर म्हणजे सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांच्या पुढे खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांना केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे आदेश लागू राहतील. सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास नौका, नौकेवर बसविलेली उपसाधने आणि मासेमारी सामग्री तसेच त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल. तसेच जास्तीत जास्त कठोर शिक्षा केली जाईल.
सर्व मच्छिमारी सहकारी संस्था, त्यांचे नौकामालक सभासद आणि अन्य संबंधितांनी याची नोंद घेऊन विहित बंदी कालावधीत यांत्रिकी नौकांद्वारे सागरात मासेमारी केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. असे आवाहन मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.
नवी दिल्ली : आज मला एका गंभीर विषयाकडे तुमचे आणि देशवासीयांचे लक्ष वेधायचे आहे. काल…
कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी लाभार्थींची कसरत! अर्ज करण्यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदत, दोन अटी केल्या शिथिल…
बार्बाडोस : आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुमचे शब्द आणि पाठिंबा यासाठी तुमचे खूप खूप आभार.…
जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, वेतन व शैक्षणिक पात्रता मुंबई : तरुणांसाठी भरघोस पगारासह सरकारी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला मुंबई : 'विधीमंडळ लोकशाहीचा प्रमुख स्तंभ आहे. या सभागृहाचा…
हाथरस : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी होऊन भीषण दुर्घटना घडली असून यामध्ये १२२ जणांचा…