चेन्नईने गुजरातला विजयासाठी झुंजवले

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएल स्पर्धेत यंदा पदार्पणातच ‘प्ले-ऑफ’मध्ये दिमाखात प्रवेश करणाऱ्या गुजरातला तळातील चेन्नईने रविवारी विजयासाठी अनपेक्षित झुंजवले. अवघ्या १३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातला शेवटच्या षटकापर्यंत खेळावे लागले. दरम्यान या सामन्यातील विजयामुळे गुजरातचे अव्वल स्थान आणखी भक्कम झाले आहे.


प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या गुजरातला चांगली सुरुवात मिळाली. ५९ धावांवर त्यांचा पहिला फलंदाज बाद झाला. मात्र तरीही १३४ धावांचे लक्ष्य गाठताना गुजरातला शेवटच्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. वृद्धीमान साहाने नाबाद ६७ धावा करत संघाला विजयी लक्ष्य गाठून दिले. चेन्नईच्या मथीशा पथीराना, प्रशांत सोलंकी, मिचेल सँटनर यांनी दमदार गोलंदाजी करत गुजरातला विजयासाठी झुंजवले.


दरम्यान प्रथम फलंदाजी करत चेन्नईने २० षटकांत ५ फलंदाजांच्या बदल्यात १३३ धावांपर्यंत मजल मारली. रुतुराज गायकवाडने ५३ धावांचे योगदान दिले. त्याला नारायण जगदीशनच्या नाबाद ३९ धावांची साथ मिळाली. गुजरातच्या मोहम्मद शमी आणि अल्झारी जोसेफ यांनी चांगली गोलंदाजी करत चेन्नईला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.

Comments
Add Comment

IPL मिनी लिलाव, कॅमरून ग्रीनचा २५.२० कोटींमध्ये KKRमध्ये समावेश

अबुधाबी : आयपीएल २०२६ साठी अबुधाबी येथे सुरू असलेल्या मिनी लिलावात क्रिकेटपटूंच्या खरेदीसाठी मोठमोठ्या बोली

मेस्सीला न भेटता अनुष्का आणि विराट कोहली महाराजांच्या भेटीला

वृंदावन : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकतीच वृंदावनमधील प्रसिद्ध

आयपीएलचा संपूर्ण लिलाव कधी, कुठे आणि केव्हा? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : आयपीएलचा लिलाव आता फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे. या लिलावासाठी आयपीएलच्या चाहत्यांमध्ये

बुमराह परतणार पण अक्षर पटेल नाही खेळणार, टीम इंडिया चिंतेत

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही

धरमशाला टी ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय, मालिकेत घेतली आघाडी

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला