अर्जुना नदीतील गाळ काढण्यासाठी निलेश राणे यांनी दिला पोकलेन

रत्नागिरी (हिं. स.) : राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीतील गाळ काढण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी पोकलेन दिला आहे. त्यामुळे गाळ काढणे आता सुलभ होणार आहे.


राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीमध्ये साचलेल्या गाळामुळे पुराची समस्या वाढली असून गतवर्षी आलेल्या महापुराचा फटका रायपाटणसह लगतच्या गावांना बसला होता. त्यामुळे अर्जुना नदीतील गाळ उपसा करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्याकडे केली होती. राणे यांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन रायपाटण येथे अर्जुना नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेत ग्रामस्थांना एक पोकलेन तत्काळ उपलब्ध करून दिला.


राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीतील गाळाचा प्रश्न ऐरणीवर आला असून गत वर्षी या साचलेल्या गाळामुळे अर्जुना नदीला अनेक वेळा पूर आला. त्यामुळे तीन बळी गेले. त्यामुळे रायपाटण येथील ग्रामस्थांनी राणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. सरपंच महेंद्र गांगण यांनी निवेदनात म्हटले होते की, या गाळ उपशाबाबत आपण याकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधूनही गाळ उपशाबाबत कार्यवाहीबाबत चालढकल केली जात आहे. निवेदनाची राणे यांनी त्वरित दखल घेऊन पोकलेनची व्यवस्था केली. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.


पोकलेनद्वारे गाळ उपसण्याचा प्रारंभ आज झाला. त्यावेळी ग्रामस्थ तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, समीर खानविलकर, सरपंच महेंद्र गांगण, मनोज गांगण, भास्कर गांगण आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका