अर्जुना नदीतील गाळ काढण्यासाठी निलेश राणे यांनी दिला पोकलेन

  84

रत्नागिरी (हिं. स.) : राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीतील गाळ काढण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी पोकलेन दिला आहे. त्यामुळे गाळ काढणे आता सुलभ होणार आहे.


राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीमध्ये साचलेल्या गाळामुळे पुराची समस्या वाढली असून गतवर्षी आलेल्या महापुराचा फटका रायपाटणसह लगतच्या गावांना बसला होता. त्यामुळे अर्जुना नदीतील गाळ उपसा करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्याकडे केली होती. राणे यांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन रायपाटण येथे अर्जुना नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेत ग्रामस्थांना एक पोकलेन तत्काळ उपलब्ध करून दिला.


राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीतील गाळाचा प्रश्न ऐरणीवर आला असून गत वर्षी या साचलेल्या गाळामुळे अर्जुना नदीला अनेक वेळा पूर आला. त्यामुळे तीन बळी गेले. त्यामुळे रायपाटण येथील ग्रामस्थांनी राणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. सरपंच महेंद्र गांगण यांनी निवेदनात म्हटले होते की, या गाळ उपशाबाबत आपण याकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधूनही गाळ उपशाबाबत कार्यवाहीबाबत चालढकल केली जात आहे. निवेदनाची राणे यांनी त्वरित दखल घेऊन पोकलेनची व्यवस्था केली. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.


पोकलेनद्वारे गाळ उपसण्याचा प्रारंभ आज झाला. त्यावेळी ग्रामस्थ तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, समीर खानविलकर, सरपंच महेंद्र गांगण, मनोज गांगण, भास्कर गांगण आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण