भारतासमोर आज अंतिम फेरीत इंडोनेशियाचे आव्हान

बँकॉक (वृत्तसंस्था) : थॉमस कप पुरुष बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून भारताने इतिहास रचला आहे. स्पर्धेचा अंतिम सामना उद्या रविवारी होणार असून भारतासमोर इंडोनेशियाचे आव्हान आहे. स्पर्धेत ७३ वर्षांत पहिल्यांदाच भारतीय संघ अंतिम फेरीचा सामना खेळणार आहे.


उपांत्य फेरीच्या सामन्यात शुक्रवारी भारताने डेन्मार्कला ३-२ असे पराभूत केले. भारताने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे. रविवारी या स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. या सामन्यात भारताची इंडोनेशियाशी लढत होणार आहे. उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर भारताचे पथक निश्चित झाले होते. भारतीय संघ पहिल्यांदाच थॉमस कप स्पर्धेत पथकावर नाव कोरणार आहे.


उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारताकडून लक्ष्य सेन मैदानात होता. त्याचा विक्टर एक्सेलसनविरुद्ध १३-२१, १३-२१ असा पराभव झाला. हा सामना ४९ मिनिटे चालला. दुसऱ्या सामना डबल्समध्ये खेळला गेला.


या सामन्यात सात्विक साईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने किम आस्त्रुप आणि मथियास क्रिस्टिएंसन जोडीला १ तास १८ मिनिटे चाललेल्या सामन्यात २१-१८, २१-२३, २२-२० असे पराभूत केले. तिसऱ्या एकेरीच्या सामन्यात किदांबी श्रीकांतने आंद्रेस एंटोनसनला २१-१८, १२-२१, २१-१५ असे पराभूत केले.

Comments
Add Comment

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल