भारतासमोर आज अंतिम फेरीत इंडोनेशियाचे आव्हान

  75

बँकॉक (वृत्तसंस्था) : थॉमस कप पुरुष बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून भारताने इतिहास रचला आहे. स्पर्धेचा अंतिम सामना उद्या रविवारी होणार असून भारतासमोर इंडोनेशियाचे आव्हान आहे. स्पर्धेत ७३ वर्षांत पहिल्यांदाच भारतीय संघ अंतिम फेरीचा सामना खेळणार आहे.


उपांत्य फेरीच्या सामन्यात शुक्रवारी भारताने डेन्मार्कला ३-२ असे पराभूत केले. भारताने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे. रविवारी या स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. या सामन्यात भारताची इंडोनेशियाशी लढत होणार आहे. उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर भारताचे पथक निश्चित झाले होते. भारतीय संघ पहिल्यांदाच थॉमस कप स्पर्धेत पथकावर नाव कोरणार आहे.


उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारताकडून लक्ष्य सेन मैदानात होता. त्याचा विक्टर एक्सेलसनविरुद्ध १३-२१, १३-२१ असा पराभव झाला. हा सामना ४९ मिनिटे चालला. दुसऱ्या सामना डबल्समध्ये खेळला गेला.


या सामन्यात सात्विक साईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने किम आस्त्रुप आणि मथियास क्रिस्टिएंसन जोडीला १ तास १८ मिनिटे चाललेल्या सामन्यात २१-१८, २१-२३, २२-२० असे पराभूत केले. तिसऱ्या एकेरीच्या सामन्यात किदांबी श्रीकांतने आंद्रेस एंटोनसनला २१-१८, १२-२१, २१-१५ असे पराभूत केले.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी